एक्स्प्लोर

आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पुन्हा नवं काहीतरी करणार आहेत. अर्थसंकल्पाची तारीख बदलल्यानतंर आता त्यांची नजर आर्थिक वर्ष बदलण्यावर आहे. रविवारी झालेल्या नीती आयोगाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा मुद्दा लावून धरला. आर्थिक वर्ष बदलण्याचा अर्थ काय? सध्याचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत आहे. तुम्ही जो आयकर भरता, कंपन्या त्यांचे निकाल घोषित करतात किंवा सरकारचा अर्थसंकल्प बनतो त्या सगळ्याचा कालावधी 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत असतो. पण आर्थिक वर्ष बदलल्याने ही तारीख 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर होईल. तर अर्थसंकल्प सादर करण्याचा महिना फेब्रुवारीऐवजी नोव्हेंबर होईल. आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय? आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा हा विकासकामांना होईल. विकासासाठी योग्य वेळेत पैसा पोहोचेल. उदाहरणार्थ, एक पूल बनवायचा असेल तर त्यासाठी फेब्रुवारीमध्ये बजेट सादर होणार. पैसा मिळण्याची सुरुवात 1 एप्रिलनंतर होईल. यानंतर कंत्राटाची प्रक्रिया सुरु होता होता जून महिना उजाडेल. जून महिना म्हणजे पावसाळ्याचा. म्हणजे तेव्हा वेळ असेल पण पैसा नसेल आणि पैसा नसेल तर विकासाचं काम रखडतं. मग मान्सून संपल्यानंतर सरकारी यंत्रणा बजेटचा पैसा खर्च करण्याच्या लगबगीत असते. तर नव्या योजनेत नोव्हेंबरमध्ये बजेट सादर होईल. 1 जानेवारीला पैसा मिळेल आणि पुढील एक-दोन महिन्यात विकासकामांना सुरुवात होईल. आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय? आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर? देशाची 58 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या महिन्यात जर दुष्काळ पडला, तर सरकारला मदतीसाठी फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागते. नव्या योजनेत सरकार नोव्हेंबरमध्येच अर्थसंकल्प सादर करु शकतं. 150 वर्षांपूर्वी 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष मानण्याची सुरुवात जगभरातील बहुतांश देशांचं आर्थिक वर्ष आणि कॅलेंडरचं वर्ष एकच आहे. आर्थिक वर्ष बदलल्यामुळे भारतीय निर्यातदारांना आणि आयातदारांना हिशेब ठेवण्यास सोपं होईल. याबाबत शंकर आचार्य समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. देशात 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष मानण्याची सुरुवात 150 वर्षांपूर्वी 1867 मध्ये झाली होती. 1984 मध्येही आर्थिक वर्ष बदलण्याचा विचार झाला होता. पण आता नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्याचा उल्लेख करत स्पष्ट केलं की, सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
Embed widget