एक्स्प्लोर

भाजपच्या दबावामुळेच मंदिर उघडण्याचा सरकारचा निर्णय : प्रविण दरेकर

आम्ही राजकारणाला बळी पडणार नाही अशा घोषणाही राणा भीमदेवी थाटात सरकारने केल्या होत्या. पण आमच्या दबावामुळे सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं.

मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आंदोलने, सांप्रदायिक मंडळींनी घेतलेली ठाम भूमिका व या भूमिकेला भाजपाने दिलेले समर्थन या दबावामुळेच राज्य सरकारला मंदिरे खुले करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण यासाठी आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कुठल्याही श्रेयासाठी आम्ही हा विषय हाती घेतला नव्हता, असं स्पष्ट मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

हिंदुत्ववादी संघटना, सांप्रदायिक मंडळी यांना मंदिरे खुली करण्याच्यासंदर्भात भाजपाने पूर्ण ताकदीने समर्थन दिले. सरकारला हा निर्णय घ्यायचा नव्हता. आम्ही राजकारणाला बळी पडणार नाही अशा घोषणाही राणा भीमदेवी थाटात सरकारने केल्या होत्या. पण आमच्या दबावामुळे सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आमच्या मनासारखा निर्णय झाल्यानंतर यासाठी आनंद व्यक्त केला व आनंदोत्सव साजरा करण्यात काही गैर नाही असेही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या भूमिका दुतोंडी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सर्व भूमिका या दुतोंडी व दुटप्पी असतात. यापूर्वी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना पुढे यायची. पहिले मंदिर फिर सरकार... अशी घोषणाही याआधी राऊत यांनी केली होती. मग आता पहिले मंदिर कुठे गेले... असा सवाल करतानाच ते म्हणाले की, मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्रातून उठाव झाला. सांप्रदायिक मंडळी मंदिर उघडण्यासाठी पुढे आली. मंदिरावर ज्यांच्या उपजिविका अंवलंबून आहेत, त्यांनीही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाने मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच भाजप यामध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे या आंदोलनामध्ये कोणता पक्ष प्रामाणिकपणे उतरला होता, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या बाबतीत या सरकारचे मत दुराग्रही

राज्य सरकारकडे संयम नाही. विधानपरिषदेच्या जागांसाठी बारा जणांच्या नावांची शिफारस सरकारने राज्यपालाकंडे केल्यानंतर त्यादृष्टीने काही प्रक्रिया आहे. त्यासाठी वाट बघावी लागते, असे सांगतानाच ते म्हणाले की, राज्यपालांच्या बाबतीत या सरकारचे मत दुराग्रही आहे. पण राज्यपाल नेहमी घटनेच्या चौकटीत राहून आपले काम करित आहे,त्यामुळे घाईने काही होणार नाही. असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना
गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर निघाले तब्बल 4 लिटर पाणी, इंडेन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप, लातूर जिल्ह्याती घटना
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
58 लाखातील एकही नोंदी कमी करु नका, अन्यथा रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले, मी विखे पाटील आणि फडणवीसांचा जप सुरु केलाय
58 लाखातील एकही नोंदी कमी करु नका, अन्यथा रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले, मी विखे पाटील आणि फडणवीसांचा जप सुरु केलाय
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget