एक्स्प्लोर

Congress Protest : ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो'; काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन

Congress Protest : आज राज्यातील अनेक भागात भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो' आंदोलन करण्यात आले.

Congress Protest : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या आरोपांवरून काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर आज राज्यातील अनेक भागात भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो' आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्याप्रमाणावर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जबाब दो मोदी जबाब दो' अशा घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आधी नवी मुंबई येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा कार्यकमात उष्माघातामुळे मृत्युमुखी पावलेल्या श्री सदस्यांना जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन

यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व 300  कोटीच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये 40 जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही, असे आरोप करण्यात आले. 

शेतकर्‍यांच्या मृत्युला जबाबदार कोण? 

तर माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मोदींनी उत्तर द्यावेत. शेतकर्‍यांना देशोधडीला करणार्‍या तीन काळ्या कायद्यांबद्दल आणि हे काळे कायदे पुन्हा घेण्यासाठी आंदोलन करतांना शहीद झालेल्या 750 पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या मृत्युला जबाबदार कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे. पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण?  याचे उत्तर मोदींनी द्यावे... त्यामुळे वरील प्रश्नांवर ‘जबाब दो मोदी जबाब दो' हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलक म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar News: उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; तुरुंगात असलेल्या 'त्या' 15 शिवसैनिकांचा दंड न्यायालयात भरला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro 3: प्रवाशांसाठी खुशखबर! सर्व भुयारी स्थानकांवर Free WiFi, MMRC चा निर्णय
Jogeshwari Attack: जोगेश्वरीत शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला, एकनाथ शिंदेंची ट्रॉमा रुग्णालयाला भेट
Thane Cluster Row: 'आम्हाला क्लस्टर नको', कळवा क्लस्टरला तीव्र विरोध, नागरिकांनी लावले निषेधाचे बॅनर
HC on Potholes: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची भरपाई, उच्च न्यायालयाचा पालिकांना इशारा
Chandrashekhar Bawankule मुंबईत दस्तऐवज नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादा हटवली,बावनकुळेंचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
Embed widget