एक्स्प्लोर

Aurangabad Water Supply Issue : औरंगाबाद शहरात पुन्हा पाण्याची बोंबाबोंब; तब्बल आठ दिवसांआड पाणीपुरवठा; शहरवासीयांमध्ये संताप

Aurangabad : नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप पाहायला मिळत आहे. 

औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाचा सामना (Aurangabad Water Supply Issue) करावा लागत आहे. त्यातच वाढती लोकसंख्या आणि शहराचा होणारा विकास पाहता पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. दरम्यान, आजघडीला शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा (Water Supply) करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून कागदोपत्री देण्यात आली आहे.पण, प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी 8 दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे, औरंगाबाद शहरात पुन्हा पाण्याची बोंबाबोंब पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप पाहायला मिळत आहे. 

शहरातील पाणीपुरवठा परिस्थिती 

  • उस्मानपुरा भागातील एकनाथनगरमध्ये 7 दिवसांआड पाणीपुरवठा
  • टीव्ही सेंटर परिसर 8 दिवसांआड
  • सिडको एन-2 मध्ये 6 दिवसांनंतर पाणीपुरवठा
  • आरेफ कॉलनी 7 दिवसांआड
  • रशीदपुरा 6 दिवसांनंतरच
  • गणेश कॉलनी 8 व्या दिवशी पाणी
  • विश्वभारती कॉलनी 5 दिवसांनंतर
  • संजयनगर, भवानीनगर 8 दिवसांनंतर
  • बायजीपुरा 8 व्या दिवशी

न्यायालयात पाक दिवसांचं शपथपत्र

शहरातील पाणीप्रश्न मागील काही वर्षात अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रकरण थेट औरंगाबाद खंडपीठात गेले आणि यावर अनेकदा न्यायालयात चर्चा झाली. पाणीपुरवठ्याच्या नियोजनावरून अनेकदा न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला खडेबोल सुनावत कान टोचले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकेने न्यायालयात शपथपत्र सादर करून पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. तर काही महिने याची अंमलबजावणीही झाली.मात्र, आता यामध्ये खंड पडला असून, आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. 

सतत पाणीपुरवठा विस्कळीत...

मागील काही दिवसांत पाणीपुरवठ्यात दररोज तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. जुलै, ऑगस्ट मध्ये जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या घटना एकामागून एक घडल्या. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे त्या सतत फुटत असतात. त्यातच औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम सुरु असल्याने यामुळे देखील जलवाहिनी फुटण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. 

निवडणुकीत फक्त घोषणा... 

प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सर्वात आघाडीवर असतो. महानगरपालिका निवडणुकीत तर सर्वाधिक भर याच मुद्यावर असते. प्रत्यके पक्षाकडून नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जातात. विशेष म्हणजे कित्येक वर्षे शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आहे. तर विरोधी पक्षात असतांना देवेंद्र फडणवीस यांनी भव्य मोर्चा काढला होता. मात्र, सत्ता आल्यावर राजकीय पक्षांकडून औरंगाबाद पाणीप्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

चिंता वाढली! मराठवाड्यात 'ऑगस्ट महिन्यात' पावसाची 71.9 टक्क्यांची तुट; 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget