Death of animals: भंडाऱ्याच्या पवनी येथील गोशाळेत चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते. मात्र, बळीराम गोशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं 30 जनावरे मृत पावली.


याप्रकरणी पवनी पोलिसांनी गोशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हतं. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत ठेवण्यात आलं होतं. मात्र, यातील 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे. 


मागील वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर झाला होता गुन्हा


गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठविले होते. मात्र, बळीराम गौशाळेच्या संचालकांनी या जनावरांना निर्दयतेनं बांधून ठेवत त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही. रात्रीला यातील 30 जनावरे मृत पावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेचे एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, गौशाळा संचालकांनी त्यांच्याकडे आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेडही नसल्यानं ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आली असल्याचीही गंभीर बाब स्पष्ट होत आहे. मागील वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती हे विशेष आहे.


 



 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra News : महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित