एक्स्प्लोर

मोठी बातमी! जालन्यातील लाठीचार्ज सरकारच्याचं आदेशाने झाला, जरांगेंकडून पहिल्यांदाच थेट आरोप

Manoj Jarange : सरकारने आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले.

बीड : जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले होते. दरम्यान, यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पोलीस विभागाला दोषी ठरवत कारवाईची मागणी केली होती. मात्र, हा लाठीचार्ज सरकारनेच घडवून आणला होता, असा गंभीर आरोप आता जरांगे यांनी केला आहे. बीड दौऱ्यावर असतांना त्यांनी हा दावा केला आहे. 

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे आज बीड जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी बीडच्या मोरवडमध्ये त्यांनी समाज बांधवांसाठी संवाद साधतांना सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, 29 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. याच आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला? याचे उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे,आंदोलनामध्ये आता आपलं रक्त सांडल आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला आहे. 

मनोज जरांगे यांचे बीड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोरवडमध्ये जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज बीड जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "मराठा बांधवांनो आत्महत्या करू नका, आपण सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोत. आत्महत्या केल्यानंतर कुटुंब उघड्यावर येतं हे सांगताना मनोज जरांगे भाऊक झाले होते. तर, आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आपण सरकारकडून आरक्षण घेऊ असं जरांगे पाटील म्हणाले. 

सरकारने निकष सांगावे...

मराठा समाज आरक्षणात बसत असतानाही आणि कायद्याचे सर्व निकष पूर्ण करून देखील मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकारने का दिले नाही. गायकवाड आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध केलं होतं. तर, याच मराठा समाजाला विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळते. मग, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही. इतर समाजाला व्यवसायावर आधारित आरक्षण दिल जातं, मग मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम सरकार का करत आहे. तर, ओबीसीमधून जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर त्याचे निकष काय आहेत हे देखील सरकारने सांगायला पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : ऐतिहासिक विजय जवळ आलाय, सरकारला सुटका नाहीच; नांदेडच्या सभेतून जरांगेंचा इशारा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: बायकोची डायरी वाचली अन् पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बिहीणीला सांगितली व्यथा, लग्नानंतर 12 व्या दिवशी तलाठ्यानं गळ्याला लावली दोर
बायकोची डायरी वाचली अन् पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बिहीणीला सांगितली व्यथा, लग्नानंतर 12 व्या दिवशी तलाठ्यानं गळ्याला लावली दोर
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Beed Crime : पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं अन् रेल्वे रुळावर फेकलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा
पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं अन् रेल्वे रुळावर फेकलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा
Beed Crime News: पहिले संपवलं, मग मित्राला रेल्वे रुळांवर ठेऊन निघाले; कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढला आणि डाव फसला; बीडमध्ये हादरवणारा थरार
पहिले संपवलं, मग मित्राला रेल्वे रुळांवर ठेऊन निघाले; कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढला आणि डाव फसला; बीडमध्ये हादरवणारा थरार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget