एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं, नेमकं काय म्हणाले शास्त्री?

Dhananjay Deshmukh Bhagwangad : आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली.

बीड:  बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चौफेर टीका होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. अशातच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर (Bhagwangad) जाऊन महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांची भेट घेतली. यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावप पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर मुंडेंना टार्गेट केलं जात असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली. 

धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं

धनंजय मुंडे-  देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे, त्याची माहिती त्यांनी महंतांना दिली. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होते. दोन मुले पुण्यता होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवलं ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसलं असतं. दलित बांधावाला वाचवण्यासाठी गेला. आमची कोणतीही गुन्हेगारी नाही. १५ वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवलं आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे. हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका

नामदेव शास्त्री - आरोपींना आम्ही माफ करणार नाही. आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही. भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो. आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही. संतोष देशमुखांच्या पाठीमागे भगवानगड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत. 

भगवान गड तुमच्या पाठीशी, ही ग्वाही देतो - नामदेव शास्त्री

भगवान बाबाला मानणारं तुमचं कुटुंब आहे. जातीय सलोखा या गावात होता. यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवलं. भगवान गड तुमच्या पाठी कायम राहील ही ग्वाही देतो, असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं आहे.  धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे की, याला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका, भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभं राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवलं. संतोष अण्णाने किती काम केलं हे त्यांनी दाखवलं. ते मूळचे बाबाचे आहेत. हे आज कळालं. त्यांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी कुटुंब करत आहे. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असंही पुढे नामदेव शास्त्री म्हणाले.

धनंजय देशमुख घेणार नामदेव शास्त्रींची भेट

नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला होता. धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं की, एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात 10 चापटा त्यांनी मारल्या असत्या तरी चालले असते. मात्र, केवळ एकाच चापटेच्या बदल्यात अशा प्रकारचा भीषण खून करण्यात आला, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget