एक्स्प्लोर

सध्याच्या राजकारणावर एक चित्रपट काढला पाहिजे : मंत्री बाळासाहेब थोरात

अजित पवार हे भाजप सोबत गेले पुन्हा आले या सगळ्या घडामोडी बद्दल मला फारसं काही बोलायचं नाही असे ते म्हणाले. पण मागील काही दिवसात जे ट्विस्ट अँड टर्न झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण स्क्रिप्ट तर तयार आहे, असे थोरात म्हणाले.

मुंबई : मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जे 'ट्विस्ट अँड टर्न' झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण या सिनेमाची स्क्रिप्ट तयार आहे, अशी भावना महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाच्या 'कॉफी विथ मिनिस्टर'  मध्ये बोलताना थोरात यांनी विविध विषयावर आपले मत व्यक्त केले. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावरील या सोहळ्यात सहा अन्य मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यात कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी देखील शपथ घेतली. एबीपी माझाशी बोलताना थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणायचे की त्यांना समोर मला विरोधी पक्ष दिसत नाही, मी म्हणायचो आरशासमोर उभे रहा मग तुम्हाला विरोधी पक्ष दिसेल. माझा विश्वास होता बदल निश्चित होईल आणि तो झाला. शिवसेनेसोबत जाण्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले की, शिवसेनेसोबत जाणं अवघड होतं. पण इतिहास पाहिला तर बाळासाहेब यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. तो इतिहास कामी आला, असे ते म्हणाले. गेली 4 महिने खूप धावपळ होती. आता थोडा रिलॅक्स आहे. कारण पहिला टप्पा काल पूर्ण झाला आहे. आजपासून कामाला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. माझं आता कुटुंब घरापूरतेच मर्यादित राहील नाही आता संपूर्ण राज्य कार्यकर्ते हे सगळे माझं कुटुंब झालंय, असे थोरात म्हणाले. अजित पवार हे भाजप सोबत गेले पुन्हा आले या सगळ्या घडामोडी बद्दल मला फारसं काही बोलायचं नाही असे ते म्हणाले. पण मागील काही दिवसात जे ट्विस्ट अँड टर्न झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण स्क्रिप्ट तर तयार आहे, असे थोरात म्हणाले. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे याकडे आता आमचं सरकार लक्ष देईल, असंही ते म्हणाले. शपथविधीच्या आधी नेत्यांची नावं घेण्यानरुन राज्यपाल महोदय का नाराज आहेत माहीत नाही. पण ज्येष्ठ नेत्यांचं नाव शपथविधी दरम्यान घेणं मला नाही वाटत काही गैर आहे. लाखो लोकं एक ठिकाणी येत असतील तर थोडं फार व्यवस्थेत इकडं तिकडं होऊ शकतं, मात्र कालच्या शपथविधीमध्ये शिस्त आपल्याला पाहायला मिळाली, असेही थोरातांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
भंडारा गोंदिया विधानपरिषद निवडणूक, भाजपकडून मतदारांची विशेष काळजी, ट्रॅव्हल्समधून सुरक्षितस्थळी रवानगी
भंडारा गोंदिया विधानपरिषद निवडणूक, भाजपकडून मतदारांची विशेष काळजी, ट्रॅव्हल्समधून सुरक्षितस्थळी रवानगी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Embed widget