Aurangabad News: गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. आधी उद्धव ठाकरे आणि त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या या प्रवासाला तब्बल 34 वर्षांचा प्रवास आहे. 1988 साली पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराचा नारा दिला, तेथून या प्रवासाला सुरवात झाली. मात्र अजूनही हा प्रवास संपला नसून, अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतर होणार आहे.


असा आहे नामांतराचा प्रवास (Aurangabad To Chhatrapati Sambhaji Nagar)



  • 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला. 

  • 1995 जूनमध्ये औरंगाबादचे 'संभाजीनगर'  नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.

  • 1995 राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली. 

  • 1996  मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

  • 1999 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. त्यामुळे नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.

  • 2002 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.

  • 2020 मार्चमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून माहिती मागविली.

  • 2021  मध्ये 'सुपर संभाजीनगर' असा नारा देत शहरात डिस्पले लागले. त्यातच पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड फुटले.

  • 2022 जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामकरणाचा मुद्दा मार्गी लावण्याबाबत जाहीर सभेत वक्तव्य केले. 

  • 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.

  • 14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.

  • 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.


आता अंतिम निर्णय केंद्र घेणार...


औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अंतिम मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणे बाकी आहे. राज्य सरकार आपला प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवेल त्यांनतर कायदेशीर सर्व विभागांच्या परवानगी घेऊन केंद्र सरकार अंतिम मंजुरी देईल. पण त्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही: नामांतरावरून खैरेंचा शिंदे-फडणीस सरकारला इशारा


Aurangabad Renamed: शिंदे-फडणवीस सरकारच्या नामांतराच्या निर्णयावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...