एक्स्प्लोर

Aurangabad: चंद्रकांत खैरेच औरंगाबादचे खासदार होणार; हर्षवर्धन जाधव यांचे मोठे वक्तव्य

Aurangabad Election: गेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना भरघोस मतं मिळाल्याने चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

औरंगाबाद: गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या याच पराभवाला माजी आमदार हर्षवर्धन जाधव असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांची  फाटाफूट झाली आणि आपला पराभव झाला असल्याचा दावा खैरे यांनी केला होता. मात्र आता त्याच हर्षवर्धन जाधव यांनी मोठं वक्तव्य केलं असून, आगामी लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा विजय होणार असल्याचं म्हटले आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत आपण कन्नड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान याचवेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्याचं उल्लेख करत, आता चंद्रकांत खैरे निवडून येणार असल्याचं जाधव म्हणाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जात होते. पण आता त्याच हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. 

काय म्हणाले हर्षवर्धन जाधव? 

यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत माझं लक्षच नव्हतं. घरगुती वादात मी एवढा अडकलो होतो की, निवडणुकीला वेळ देऊ शकलो नव्हतो. या गृहकलहात मी इतका अडकलो की रायभन जाधव साहेबांनी दिलेली जबाबदारीच मी विसरून गेलो. माझ्या एका मित्राचा महावितरणाच्या चुकीमुळे जीव गेला आणि त्याचे मुलं उघड्यावर आली. त्यामुळे मी गृहकलह-गृहकलह करत बसल्यास आशा घटना घडत राहतील. म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. तर इम्तियाज जलील म्हणतात, ते पुन्हा खासदार होतील. मात्र यावेळी चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा औरंगाबादचे खासदार होणार असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. आपण विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले.

हर्षवर्धन जाधवांमुळे खैरेंचा पराभव?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव देखील मैदानात होते. मराठा आरक्षणावरून राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी भरभरून मतदान केलं. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांची मत फुटली आणि याचाच फायदा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना झाला. खैरे आणि जाधव यांच्या वादात जलील यांना विजय मिळाला होता. त्यामुळे आपल्या पराभवाला हर्षवर्धन जाधवच जबाबदार असल्याचं आरोप खैरे यांनी अनेकदा केला होता.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget