एक्स्प्लोर

Ahmednagar News: रेशन दिले एक महिन्याचे आणि नोंद केली दोन महिन्यांची, शिर्डीजवळील राजुरी गावातील प्रकार

Ahmednagar News: राहाता तालुक्यातील राजूरी ‌येथे स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्याचे धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडे बिल मागितले आहे.

अहमदनगर: स्वस्त धान्य दुकानदाराने एक महिन्याच रेशन (Ration) दिलं आणि दोन महिन्याच्या धान्याची नोंद करून घेतल्याचा प्रकार शिर्डी जवळील राजुरी गावात उघडकीस आला आहे.  लाभार्थ्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तपासले असता हा प्रकार उघडीस आला आहे.  विशेष म्हणजे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात हा सगळा प्रकार घडला असून चुकून हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण दुकानदाराने दिलं आहे.  सर्वांना त्यांचा शिधा वेळेवर दिला जाईल हे सुद्धा सांगण्यात आले आहे.

राहाता तालुक्यातील राजुरी ‌येथे स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्याचे धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडे बिल मागितले. मात्र मशिनचा प्रॉब्लेम असल्याने बिल देता येत नाही असे कारण दुकानदाराने दिले. एक नव्हे तर गावातील बहुतांशी लाभार्थ्यांना हाच प्रत्यय आला.  काही सुजाण ग्रामस्थांनी शासनाच्या संकेतस्थळावर चेक केले असता नागरिकांना आपल्या नावे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याच धान्य वितरीत झाल्याचा प्रकार लक्षात आला.  त्यानंतर लाभार्थ्यांनी राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडे लेखी ‌तक्रार केली आहे. 

 याबाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराला विचारले असता ही बाब चुकून घडली असून मार्च महिन्याचे धान्य आणि नोंदणीकृत लाभार्थी यांना आनंदाचा शिधा एकत्र देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र मार्च महिन्याचा आगाऊ थंब घेऊन धान्य उपलब्ध नसताना वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यामागे कारण काय असा सवाल उपस्थित झाला आहे.  

 ग्रामीण भागात अनेकदा नेट किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे काही दुकानदार आगाऊ थंब घेतात.  मात्र हे चुकीचे असल्याचे म्हणत तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या प्रकरणातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय.

धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात 

राजुरी प्रमाणे राज्यात इतरही ठिकाणी अनेक स्वस्त धान्य दुकानदारांकडून असा अनागोंदी कारभार सुरू  असू शकतात. अनेक ठिकाणी गरिबांना ऑनलाईनमाहिती नसते त्यामुळे याबाबतीत नियमावली बनवण्याची गरज असून अशा प्रकारांची चौकशी करून काळाबाजार तर गेला जात नाही ना हे समोर आणायची गरज आहे..

महत्त्वाच्या बातम्या

Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget