तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलं. अडीच तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल, तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
2/7
विधानभवना वीजपुरवठा होणाऱ्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने, मेन स्विच बंद करण्यात आला आहे. परिणामी विधीमंडळ अंधारात आहे.
3/7
त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज स्थगित झालं आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे.
4/7
पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये घडली आहे. नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेने नागपूर महापालिका आणि प्रशासन म्हणजेच भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं.
5/7
वीज गेल्यामुळे विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं आहे.
6/7
विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागेल, असं सांगितलं जात आहे
7/7
नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे.