Travel : करिअर घडवायचंय म्हणून शहरातील आजकालचं धावपळीचं जीवन, प्रवासाची दगदग, वाढतं प्रदुषण, ट्राफिक, कामाचं टेन्शन या सर्व गोष्टींमुळे शहरांमध्ये राहणे प्रत्येकासाठी अत्यंत आव्हानात्मक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे कधीही न संपणारी वाहतूक कोंडी, आवाज, काँक्रीटच्या उंच इमारती अशा वातावरणात जीव नकोसा होतो, असं वाटतं या सर्वांपासून दूर कुठेतरी जिथे शांतता, मोकळी हवा आणि निसर्गाचे सानिध्य लाभेल अशा ठिकाणी जायचं मन करतं. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही गावांबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या सौंदर्यासोबतच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट देणे गरजेचे आहे.




मावलिननांग


मावलिननांग हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव असल्याचे म्हटले जाते. 2003 मध्ये या गावाला डिस्कव्हर इंडियाने "आशियातील सर्वात स्वच्छ गाव" म्हणून सन्मानित केले होते. मावलिनॉन्गमधील 95 घरांपैकी प्रत्येक घरात बांबूपासून बनविलेले डस्टबिन आहे, ज्याचा वापर कचरा गोळा करण्यासाठी केला जातो. मग ते एका सामान्य खड्ड्यात टाकले जाते आणि खत म्हणून वापरले जाते. या गावातील 100 टक्के लोक सुशिक्षित आहेत. या गावात प्रत्येक प्लास्टिकवर बंदी आहे ज्याचा सहज रिसायकल करता येत नाही. याशिवाय गावातील हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी येथे धूम्रपान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, एवढेच नाही तर कोणी धूम्रपान करताना दिसल्यास त्याला दंड आकारला जातो.




नाको व्हॅली, हिमाचल प्रदेश


हे गाव स्पिती व्हॅलीमध्ये आहे, आणि तिबेट सीमेच्या अगदी जवळ आहे. या शांत छोट्या गावात एक प्राचीन मठ संकुल आहे, चार जुन्या मंदिरांचा समूह आहे जो बौद्ध लामा चालवतात. या मंदिरांच्या भिंतींवर अतिशय सुंदर चित्रे काढण्यात आली आहेत. हे गाव स्वच्छतेसाठीही प्रसिद्ध आहे.




खोनोमा


हे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून 20 किमी अंतरावर आहे. हे गाव सामुदायिक संवर्धन प्रकल्पांसाठी ओळखले जाते. सुमारे 3000 लोकसंख्येचे हे 700 वर्षे जुने गाव हिरवीगार जंगले आणि भात लागवडीसाठी ओळखले जाते.




इडुक्की


इडुक्की हे केरळमधील एक अतिशय सुंदर गाव आहे जे नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्हाला वळणदार रस्ते, हिरवीगार जंगले, वाहणारे धबधबे आणि स्वच्छ तलाव आढळतील.




झिरो, अरुणाचल प्रदेश


येथील सुंदर दऱ्या आणि स्वच्छता लोकांना खूप प्रभावित करते. दरवर्षी येथे संगीत महोत्सवाचे आयोजनही केले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही या ठिकाणाचा समावेश आहे. झिरोमध्ये तुम्हाला सुंदर हिरवे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. येथील टेकड्या देवदार आणि बांबूच्या झाडांनी झाकलेल्या आहेत.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : गोव्यात लपलाय निसर्गसौंदर्याचा खरा खजिना! फार कमी लोकांना माहिती 'ही' ठिकाणं नाही पाहिली तर नवलंच..!