एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : मिहिरच्या सुटकेसाठी सावनी सरसावली, स्वातीमुळे कार्तिक तुरुंगात; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल?

Premachi Goshta Serial Update : तुरुंगात असलेल्या भावाच्या सुटकेसाठी सावनी पोलिसांकडे जाते. तर, स्वातीदेखील पोलिसांत जबाब देते. हर्षवर्धन सावनीकडे लग्नासाठी अट ठेवतो. आता सावनी काय करणार, मिहिर आणि सावनीमधील भांडणे दूर होतील का,

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता वळण येणार आहे.  तुरुंगात असलेल्या भावाच्या सुटकेसाठी सावनी पोलिसांकडे जाते. तर, स्वातीदेखील पोलिसांत जबाब देते. हर्षवर्धन सावनीकडे लग्नासाठी अट ठेवतो. आता सावनी काय करणार, मिहिर आणि सावनीमधील भांडणे दूर होतील का,  या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळतील. 

मिहिरच्या सुटकेसाठी सावनीचे प्रयत्न 

मिहिरला तुरुंगात गेल्यानंतर सावनी पोलीस स्टेशनला जाते आणि त्याला सोडवण्याची विनंती करते. मिहिरच्या लग्नासाठी मी हे सोनं खरेदी केले होते. डेस्टिनेशन वेडिंगसाठी काही रोख रक्कम होती. हे सगळं एका बॅगेत ठेवले होते. ही बॅग सागरला अडकवण्यासाठी कार्तिकने घरातून चोरली असल्याचे सावनी पोलिसांना सांगते. या प्रकरणात सागर आणि मिहिरची चूक नसल्याचे सावनी सांगते.

स्वातीदेखील पोलीस स्टेशनला आलेली असते. कार्तिकच्या सांगण्यावरून आपण ही बॅग आमच्या घरात ठेवली असल्याचे स्वाती सांगते. मी पोलीस स्टेशनला तक्रार करायला आली होते, पण त्याने माझे अपहरण केले असल्याचे स्वाती सांगते. तेवढ्यात कार्तिकला पोलीस ठाण्यात येतो आणि हे सगळं काय सुरू आहे हे विचारतो. स्वाती धीर ठेवत ती बॅग ह्या माणसाने सागरच्या घरात ठेवायला सांगितली आहे, असे सांगते. कार्तिकला पोलीस अटक करतात. 

हर्षवर्धनची सावनीकडे लग्नासाठी अट

मिहिरची सुटका झाल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटतो. मिहिरने आपल्याकडे पाहिलेदेखील नाही, याचे सावनीला वाईट वाटते.  मिहिरची सुटका केल्याने हर्षवर्धन सावनीवर चिडतो.  मिहिर हा सागरचा राईट हँड आहे, तो तुरुंगात असल्यानंतरही आपण सागरचे मोठे नुकसान केले  असते असे हर्षवर्धन सावनीला सांगतो. त्यावर सावनी म्हणते की, हर्षवर्धन हा माझा भाऊ आहे. तो तुरुंगात असताना मी सेलिब्रेशन नाही करू शकत, त्याचे तुरुंगात असणे हा माझ्यासाठी पराभवच आहे असे सावनी सांगते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की, माझं चुकलं, मला माफ कर. तुला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर तुझ्या भावाला माझ्या पाया पडून तुझ्यासोबत लग्न करायला सांग असे हर्षवर्धन सांगतो. 

कोळी कुटुंबाच्या घरी आनंदाचे वातावरण, सावनी घालणार वाद

इकडं कोळी कुटुंबात मिहिरच्या लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू असते. सगळेजण लग्नातील मेन्यू काय असेल, ड्रेस कोड काय असेल याची चर्चा सुरू असते. बऱ्याच दिवसांनी कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मिहिर मुक्ताला माझी करवली म्हणून उभी राहशील का असे विचारतो. हे सगळे सावनी पाहत असते. सावनीला हे पाहताच वाईट वाटते. सावनी आलेली पाहून सगळ्यांना धक्का बसतो. सावनी मुक्ताला उलटसुलट बोलते. जे तुझ्याकडे नाही, ते माझ्याकडून हिसकावून घेतेस. तू आई होऊ शकत नाही म्हणून माझी सईला हिसकावलं, आता आदित्यवर डोळा असल्याचे सावनी म्हणते. सावनीच्या बेछुट बोलण्यावर सागर भडकतो. तुला इथे कोणी बोलावलं नाही तरीही इथे का आलीस असे सावनीला विचारतो. त्यावर  सावनी म्हणते की तू यातून लांब राहा. भांडण माझा आणि मुक्ताचे आहे, तू मध्ये पडू नको. 

यावर मिहिरमध्ये बोलतो की, या घरात सुखाचा संसार सुरू असताना तूच सोडून गेली. त्यावर सावनी म्हणते की तो संसार माझ्यासाठी कधीच सुखाचा नव्हता. आज मी हर्षसोबत असून सुखी आहे. तो माझ्याशी लग्न करणार असून त्याने एक अट ठेवली आहे. मिहिरने त्याच्यासोबत जाऊन लग्नाची बोलणी करावी अशी अट असल्याचे सावनी सांगते. हर्षवर्धनची अट ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget