Aai Kuthe Kay Karte : मागील काही महिन्यांपासून आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका फार काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याचं चित्र आहे. त्यातच आशुतोषच्या मृत्यूनंतर या मालिकेवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पण तरीही मालिका सुरुच ठेवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. या मालिकेत एकंदर दाखवण्यात येणाऱ्या घटनांवर अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्यातच आता या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाची (Rishi Saxsena) एन्ट्री होणार आहे. पण या एन्ट्रीवर प्रेक्षकांनीकडून फारश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या नसल्याचं पाहायला मिळतंय. 



ऋषी या मालिकेतून महीर शर्मा ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तो एक उत्तम शेफ दाखवला आहे. मिहीरची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती असते. तसेच महीरने तिच्याकडून गाणं शिकावं अशी देखील त्याच्या आईची इच्छा असते. पण त्याची आई हे जग सोडून जाते आणि तो अरुंधतीला भेटतो. त्यामुळे आता अरुंधती आणि महीरचा प्रवास दाखवला जाणार आहे.




नव्या प्रोमोवर प्रेक्षकांची नाराजी


आई कुठे काय करते या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. त्यावर अनेकांनी कमेंट्स केली आहे. एकाने विचारलं की, आता अरुंधतीचं दुसरं सॉरी तिसरं लग्न दाखवणार का? तर एकाने म्हटलं की, की या बाईची आधीच 3 मुलं आहेत, त्यात 2 अनाथ मुली आणल्यात, आता ह्याचं काय मध्येच. ही मालिका संपूर्ण कुटुंबव्यवस्था खराब करतेय. स्वत:ची मुलं सोडायची आणि बाहेरची पोरं डोक्यावर घ्यायची. 






ऋषीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट


याचदरम्यान ऋषीने देखील त्याच्या भूमिकेविषयी बोलणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामध्ये त्याने म्हटलं की, नमस्कार, मी ऋषी सक्सेना. आज मी तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलोय. मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना भेटायला येतोय ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत. 9 जूनच्या महाएपिसोडपासून मी हा प्रवास सुरू करतोय. फार इंटरेस्टिंग भूमिका आहे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तसेच त्याने मिहीर शर्मा’ येतोय तुमच्या भेटीला… असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. त्यावर त्याच्या एका चाहत्याने हटके कमेंट केली आहे. 






चाहत्याच्या कमेंटवर ऋषीनेही दिलं उत्तर


ऋषीच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली की, 'भाई येतोस तर ये, असं पण आम्ही त्या मालिकेला दुर्लक्षचं करत आलोय. पण हा दुसरा वगैरे नवरा बनून नको येऊ कुणाचा म्हणजे झालं'. त्यावर ऋषीने हसण्याचा इमोजी कमेंट केला आहे. पुढे हा चाहता म्हणाला की, 'तसं नाही रे ब्रो..,गंमत म्हणून बोलतोय. पण सर्व गोष्टी अति प्रमाणात दाखवतायत. घटस्फोट, लफडी, दुसरं लग्न इतकं सामान्य गोष्ट झाली की ते सहजपणे दाखवणं सुरू झालं आणि आपली संस्कृती अशी नाहीये, याच गोष्टी प्रेक्षकांना आवडत नाही बसं. अभिनेता म्हणून तू उत्तम कलाकार आहेसच.'  त्यावर ऋषीने उत्तर दिलं की, “नवरा बनून नाही येणार, मग बघशील?” त्यावरही हा चाहता म्हणाला की, “हो नक्की. पण या मालिकेऐवजी जर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत तुला बघायला मिळालं असतं ना तर अजून जास्त आवडलं असतं सर्वांना.” त्यावर ऋषीने त्याला स्मार्ट असं उत्तर दिलंय. 


ही बातमी वाचा : 


Chunky Panday : अनन्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा, तर आदित्य अन् चंकी पांडेंची गोव्यात मज्जा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ