एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूतच्या वादळानंतर अभिनेत्रीचं काम थांबलं, 6 वर्षांनी अभिनयात पुनरागमन; म्हणाली ' Exit स्वेच्छेने नव्हती '

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता.

Sushant Singh Rajput Riya Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी वेबसीरिज ‘फॅमिली बिझनेस’मधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता. जून 2020 नंतर तिला प्रचंड मानसिक तणाव आणि सार्वजनिक टीकेला सामोरं जावं लागलं.

अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या....

या संपूर्ण कालखंडाकडे मागे वळून पाहताना रियाने अभिनयातून दूर जाण्याचा निर्णय किती वेदनादायक होता, याबद्दल खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, जवळपास दहा वर्षं अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडल्यानंतर अभिनय सोडावा लागणं तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. अभिनयाचं स्वप्न बाजूला ठेवण्यासाठी तिला अनेक थेरपी सेशन्स घ्यावे लागले. “मला अभिनयाच्या संधीच मिळत नव्हत्या, त्यामुळे त्याबद्दल विचार करणंही थांबवावं लागलं,” असं ती म्हणाली.

रिया पुढे सांगते की, सुरुवातीला तिने अनेक प्रोजेक्ट्स नाकारले आणि स्वतःला अभिनयापासून पूर्णपणे दूर ठेवलं. मात्र तिच्या कमबॅकमागे हंसल मेहता यांचा मोठा वाटा असल्याचं तिने मान्य केलं. “हंसल सर आणि लेखकांनी मला विचारलं की मला अभिनयापासून रोखणारं नेमकं काय आहे. मी त्यांना सांगितलं की मी अभिनय सोडला आहे. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की, त्यामुळेच तुला हे काम करायला हवं. तू चांगलं करशील की नाही, याला अर्थ नाही,” असं रियाने सांगितलं.

अभिनयातून Exit स्वेच्छेने नव्हती..

या निर्णयाकडे मागे वळून पाहताना रिया म्हणते की, आता मला हा निर्णय योग्य वाटतो. “सेटवर परत जाणं वेगळंच होतं. गेल्या सात वर्षांत खूप काही अनुभवलं आहे,” असं तिने नमूद केलं. दरम्यान, अभिनयापासून दूर राहण्याचा काळ हा आपला स्वेच्छेचा निर्णय नव्हता, हेही रियाने स्पष्ट केलं. “त्या काळात कुणालाच माझ्यासोबत काम करायचं नव्हतं, तो काळ अत्यंत वेदनादायक होता,” असं ती म्हणाली. या कठीण काळात मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण सावरू शकलो, असंही तिने सांगितलं. “माझे मित्र आणि कुटुंब नसते, तर कदाचित मी या सगळ्यातून बाहेर येऊ शकले नसते,” अशी भावना तिने व्यक्त केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinay Mandke News: 'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
7 गाणी, जबरदस्त कथा अन् अस्सल लोकसंगीत! ‘फुला’चा ट्रेलर एकदा पहाच, लहान वयात खंडोबाशी लग्न अन्..
7 गाणी, जबरदस्त कथा अन् अस्सल लोकसंगीत! ‘फुला’चा ट्रेलर एकदा पहाच, लहान वयात खंडोबाशी लग्न अन्..
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
Shweta Shinde: 'छोटासा कोपरा अन् प्रसाद आणि माझे हॉट सीन्स...' अवघाची संसार मालिकेतील इंटिमेट सीन्सवर श्वेता शिंदे थेटच बोलली
'छोटासा कोपरा अन् प्रसाद आणि माझे हॉट सीन्स...' अवघाची संसार मालिकेतील इंटिमेट सीन्सवर श्वेता शिंदे थेटच बोलली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Baramati Bypoll: 'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
Pune News: 180 किलोमीटर सायकलिंग, 42 KM रनिंग अन् पोहत 4 किलोमीटरचं अंतर कापलं, पुण्याच्या बाप-लेकाने खडतर आयर्नमॅन स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला
180 किलोमीटर सायकलिंग, 42 KM रनिंग अन् पोहत 4 किलोमीटरचं अंतर कापलं, पुण्याच्या बाप-लेकाने खडतर आयर्नमॅन स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला
Pune Crime News: पती पत्नीचं पटेना; एकमेकांपासून फारकत, जन्मदात्या आईने 13 वर्षीय मुलीचा गळा आवळला, 6 वर्षाच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली, तिनं पाईपला धरलं पण...
पती पत्नीचं पटेना; एकमेकांपासून फारकत, जन्मदात्या आईने 13 वर्षीय मुलीचा गळा आवळला, 6 वर्षाच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली, तिनं पाईपला धरलं पण...
Pune Accident News: पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक; क्रेनचा पार्ट थेट ट्रेलरच्या केबिनमध्ये घुसला
पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक; क्रेनचा पार्ट थेट ट्रेलरच्या केबिनमध्ये घुसला
Panchganga River Pollution: कोल्हापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा नदीची झाली विषारी गटारगंगा; अवघ्या15 दिवसांत दुसऱ्यांदा मृत माशांचा खच, औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत
कोल्हापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा नदीची झाली विषारी गटारगंगा; अवघ्या15 दिवसांत दुसऱ्यांदा मृत माशांचा खच, औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत
पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले
पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
Embed widget