एक्स्प्लोर

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे 'स्थगिती सरकार' : नारायण राणे

कोकणातली विकास काम ठप्प झाली आहेत आणि त्याला पूर्णपणे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे शेतकरी, व्यवसाय यांच्या भल्यासाठी एकत्र आलेले नसून फक्त स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी या सरकारवर टीका करत हे सरकार टिकणार नसल्याचा दावा केला आहे. यात आता भाजप खासदार नारायण राणे यांची भर पडली आहे. राज्यात झालेले बदल आणि त्यामुळे कोकणाच्या विकासावर झालेला परिणाम यावर बोलण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी सरकारवर टीका करत सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा केला. राणे यावेळी म्हणाले की, 28 नोव्हेंबरला सरकार स्थापन झालं आहे. आज 8 डिसेंबर असून आजवर त्यांचे मंत्री आणि खाती ठरली नाहीत. या सरकारला मी एक नाव दिलं ते म्हणजे स्थगिती सरकार. या सरकारने अनेक चांगल्या विकास कामांना स्थगिती दिली त्यामुळे विकास ठप्प झाला आहे, असेही राणे म्हणाले. चांगल्या कामांना स्थगिती द्यायची आणि ठेकेदारांना बोलवायचं त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, असा आरोपही त्यांनी केला. राणे म्हणाले की, कोकणातली विकास काम ठप्प झाली आहेत आणि त्याला पूर्णपणे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे शेतकरी, व्यवसाय यांच्या भल्यासाठी एकत्र आलेले नसून फक्त स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथल्या खासदारांनी आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा बैठका कोणत्या अधिकाराखाली घेतो. सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना कोणत्या अधिकारात आदेश देऊ शकतो. त्यामुळे बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काही तरी करतोय हे सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ही जनतेची फसवणूक आहे, असे ते म्हणाले. येणाऱ्या 15 ते 18 ऑक्टेबरला आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुक्यात गाव भेटी घेणार आहोत. या भेटीदरम्यान जनतेला या निवडणुकीमध्ये भाजप सरकार स्थापन का करू शकलं नाही? तीन पक्षाचं सरकार राज्याला पोषक नाही या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. या सरकारने ज्या विकास कामाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आवाज उठवला जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यावर आरोप केला. ते सांगतात ती एकही गोष्ट खरी नसते. ते थापाडे आमदार आहेत, असं एकेरी उल्लेख करत आरोप केला. गेल्या 10 दिवसात खाते वाटप करू शकले नाहीत. ज्या माणसाला प्रशासनाची एबीसीडी माहिती नाही त्याच्याकडून काय अपेक्षा आहे. महाराष्ट्रातचं काय होणार याची आम्हाला चिंता आहे, असेही राणे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 March 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच साडेसातीतून मुक्तता, आजचे राशीभविष्य वाचा...
आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच साडेसातीतून मुक्तता, आजचे राशीभविष्य वाचा...
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget