एक्स्प्लोर

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'

Manoj Muntashir On Student Protest: गीतकार, कवी मनोज मुंतशीर यांनी मुलाखतीत बोलताना जंतर-मंतरवरील आंदोलकांना 'देशद्रोही' ठरवलंय आणि हे वक्तव्य त्यांनी 'पूर्ण जबाबदारीनं' केलंय, असंही त्यांनी सांगितलंय.

Manoj Muntashir On Student Protest: प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush Movie) सिनेमासाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे गीतकार, कवी मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) पुन्हा एकदा लोकांच्या रोषाला बळी पडले आहेत. 20 जुलै रोजी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि हिंसाचार यामुळे लोकांचे डोळे पाणावले असून मन दुःखी, संतप्त झालंय. अशा परिस्थितीत, 50 ​​वर्षीय मनोज मुंतशीर यांनी एका अलिकडील मुलाखतीत जंतर-मंतरवरील आंदोलकांना 'देशद्रोही' ठरवलंय आणि हे वक्तव्य त्यांनी 'पूर्ण जबाबदारीनं' केलंय, असंही त्यांनी सांगितलंय. पण, संगीतकारानं केलेल्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

काही युजर्स त्यांना 'आदिपुरुष'मधील त्या उथळ संवादांची आठवण करून देत आहेत, तर काहींनी अशी इच्छा व्यक्त केलीय की, सध्याच्या पिढीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, तशी वेळ या गीतकाराच्या भावी पिढीवर येऊ नये.

उत्तर प्रदेशातील अमेठी इथे जन्मलेल्या मनोज मुंतशीर यांनी 'टाइम्स नाऊ नवभारत'ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ते कधीही जंतर-मंतरवर जाणार नाहीत, कारण तिथे सध्या आंदोलकांशी संबंधित असलेल्या लोकांच्या बाजूला उभं राहण्याची त्यांची इच्छा नाही. ते म्हणाले की, "मी कधीही जंतर-मंतरवर जाणार नाही... मी जाणार नाही कारण जंतर-मंतरचं प्रतिनिधित्व करणारे लोक सध्या जे आहेत, ते दुर्दैवानं... अशा प्रकारचे लोक नाहीत, ज्यांच्यासोबत उभं राहणं मला सोयीचं किंवा योग्य वाटेल..."

मनोज मुंतशीर यांनी 'नीट' (NEET) परीक्षेचा पेपर फुटणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवरही भाष्य केलंय. मुलाखतीत बोलताना त्यांनी, नीटचा पेपर फुटल्याप्रकरणी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरलंय. 

'कॉकरोच जनता पार्टी'बद्दल बोलताना ते म्हणाले की, "या देशातील तरुण 'कॉकरोच जनता पार्टी'पेक्षा अधिक चांगल्या गोष्टीस पात्र आहेत. नीटचा पेपर फुटणं ही चांगली गोष्ट होती, असं जगात कोण म्हणेल? कोण असं म्हणेल? ती घटना चुकीचीच होती. जर एकाही विद्यार्थ्याचा जीव गेला असेल, तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे..."

"मी अत्यंत जबाबदारीनं त्यांना देशविरोधी म्हणतोय..." (Manoj Muntashir On CJP Protest)

मनोज मुंतशीर पुढे बोलताना म्हणाले की, "पण चर्चा तर जंतर-मंतरवर जे काही घडतंय त्याबद्दल आहे... मी स्वतःही तिथली भाषणं ऐकतोय आणि तिथे येणाऱ्या लोकांचं निरीक्षण करतोय, असे लोक जे 'भारताचे तुकडे केले जातील', अशा घोषणा देतात आणि काश्मीर हा भारताचा भाग नाही असा दावा करतात... मी अत्यंत जबाबदारीच्या भावनेतून त्यांना देशद्रोही म्हणतोय... ते आपल्या प्रभू श्रीरामांचा उल्लेख केवळ 'सीतेचा पती' असा करतात... हे अत्यंत अपमानजनक आहे..."

एका युजरनं टिप्पणी केलीय की, "जर हजारो तरुण देशद्रोही असतील, तर..."

मनोज मुंतशीर यांनी दिलेल्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "मनोज मुंतशीर, देशद्रोही असण्याची व्याख्या काय आहे? करिअरसाठी आपली विचारधारा बदलणं? जर हजारो तरुण देशद्रोही असतील, तर मग पंतप्रधानही या देशाला वाचवू शकणार नाहीत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget