Lok Sabha Result 2024 : आता अवघ्या काही तासांत संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर येणार आहे. लोकसभा निवडणूक 2024चा (Lok Sabha 2024) निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक मतदारसंघात ही अगदी अस्मितेची लढाई झालीये. अगदी सामान्यांना देखील यंदाचा अंदाज वर्तवणं फार अवघड जातंय. त्यातच आता बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने देशाचा निकाल लागण्याआधीच पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) तसेच भाजपचे अभिनंदन केलं आहे. 


अभिनेता कमाल खाने त्याच्या सोशल मीडियावरुन पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचं अभिनंदन केलं आहे. देशात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत पाहायला मिळाली आहे. त्यातच एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे देशात एनडीएचं सरकार पुन्हा येणार अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यातच कमाल खानने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं असल्याचं पाहायला मिळतंय. 


कमाल खानने काय म्हटलं?


कमाल खानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत कायमच पुढे जात राहिल. भाजप 300 ते 350 जागा जिंकणार. त्यामध्ये कोणीही काहीही करु शकत नाही.  






कमाल खान ट्रोल


दरम्यान कमाल खानच्या या ट्विटनंतर त्याच्या सोशल मीडियावर बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यावरही त्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, जेव्हापासून मी भाजप जिंकल्याचं ट्विट केलं आहे, तेव्हापासून अनेकजण मला ट्रोल करत असल्याचं पाहायला मिळतंय. माझ्या ट्विटमुळे लोकं दुखावली असतील. पण हेच सत्य आहे की पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.  






ही बातमी वाचा : 


Aishwarya Narkar : 'तुम्हाला लग्नानंतर कोणी प्रपोज केलंय का?' चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाल्या, 'सगळ्यांना माहितीये...'