एक्स्प्लोर

28 वर्षानंतर येणाऱ्या बॉर्डर-2साठी जावेद अख्तरांनी गाणी लिहिण्यास दिला स्पष्ट नकार, म्हणाले, 'हे सर्जनशील दिवाळं..'

बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Border 2 Javed Akhtar: 28 वर्षानंतर बॉर्डरचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येत आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर या चित्रपटांना बॉलीवूडच्या वॉर फिल्मचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है' सारख्या अजरामर गाण्यांनी या चित्रपटाला वेगळीच उंची दिली होती.  आता तब्बल 28 वर्षानंतर बॉर्डर 2 मोठ्या पडद्यावर येत असताना या चित्रपटातील गाण्यांविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. पण या सिक्वलमध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे एकही गाणे नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'खरंतर हे सर्जनशील दिवाळं '

बॉर्डर 2 चित्रपटासाठी पुन्हा गाणी लिहाल का असं या चित्रपटाच्या मेकर्सने जावेद अख्तरांना विचारलं होतं. मात्र त्यांना स्पष्ट नकार देत आधीच हित असलेलं गाणं थोडासा बदल करून पुन्हा देणं म्हणजे सर्जनशील दिवाळं आहे असं म्हणत तिखट नकार दिला. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, ‘बॉर्डर 2’साठी गाणी लिहिण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. “मेकर्सनी मला लिहायला सांगितलं होतं, पण मी नकार दिला. मला खरंच वाटतं की हे बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळपण आहे. एखादं जुनं गाणं यशस्वी ठरलं म्हणून त्यात थोडंसं बदल करून ते पुन्हा सादर करणं योग्य नाही. नवीन गाणी तयार करा, अन्यथा मान्य करा की आता तुम्ही तोच दर्जा गाठू शकत नाही,” असं ते म्हणाले.

भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही

जुन्या गाण्यांच्या रिमेकवरही जावेद अख्तर यांनी परखड मत मांडलं. “जे झालं, ते होऊन गेलं. त्याला पुन्हा निर्माण करण्याची गरज काय? आमच्यासमोर ‘हकीकत’सारखा चित्रपट होता. त्यातील ‘कर चले हम फिदा’ आणि ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ ही गाणी अफलातून होती. तरीही आम्ही ती वापरली नाहीत. पूर्णपणे नवीन गाणी लिहिली आणि ती लोकांना आवडलीसुद्धा,” असं त्यांनी सांगितलं. मार्केटिंगसाठी जुनी आठवण ताजी करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टोला लगावला. “तुम्ही पुन्हा चित्रपट बनवत असाल, तर नवीन गाणी तयार करा. भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जुन्या वैभवावरच जगायचं, असा संदेश यातून जातो,” असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान,‘बॉर्डर 2’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्याला अरिजीत सिंग, विशाल मिश्रा, दिलजीत दोसांज आणि सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. मूळ गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि संगीत अनु मलिक यांचं होतं. अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget