एक्स्प्लोर

28 वर्षानंतर येणाऱ्या बॉर्डर-2साठी जावेद अख्तरांनी गाणी लिहिण्यास दिला स्पष्ट नकार, म्हणाले, 'हे सर्जनशील दिवाळं..'

बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Border 2 Javed Akhtar: 28 वर्षानंतर बॉर्डरचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येत आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर या चित्रपटांना बॉलीवूडच्या वॉर फिल्मचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है' सारख्या अजरामर गाण्यांनी या चित्रपटाला वेगळीच उंची दिली होती.  आता तब्बल 28 वर्षानंतर बॉर्डर 2 मोठ्या पडद्यावर येत असताना या चित्रपटातील गाण्यांविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. पण या सिक्वलमध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे एकही गाणे नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'खरंतर हे सर्जनशील दिवाळं '

बॉर्डर 2 चित्रपटासाठी पुन्हा गाणी लिहाल का असं या चित्रपटाच्या मेकर्सने जावेद अख्तरांना विचारलं होतं. मात्र त्यांना स्पष्ट नकार देत आधीच हित असलेलं गाणं थोडासा बदल करून पुन्हा देणं म्हणजे सर्जनशील दिवाळं आहे असं म्हणत तिखट नकार दिला. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, ‘बॉर्डर 2’साठी गाणी लिहिण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. “मेकर्सनी मला लिहायला सांगितलं होतं, पण मी नकार दिला. मला खरंच वाटतं की हे बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळपण आहे. एखादं जुनं गाणं यशस्वी ठरलं म्हणून त्यात थोडंसं बदल करून ते पुन्हा सादर करणं योग्य नाही. नवीन गाणी तयार करा, अन्यथा मान्य करा की आता तुम्ही तोच दर्जा गाठू शकत नाही,” असं ते म्हणाले.

भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही

जुन्या गाण्यांच्या रिमेकवरही जावेद अख्तर यांनी परखड मत मांडलं. “जे झालं, ते होऊन गेलं. त्याला पुन्हा निर्माण करण्याची गरज काय? आमच्यासमोर ‘हकीकत’सारखा चित्रपट होता. त्यातील ‘कर चले हम फिदा’ आणि ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ ही गाणी अफलातून होती. तरीही आम्ही ती वापरली नाहीत. पूर्णपणे नवीन गाणी लिहिली आणि ती लोकांना आवडलीसुद्धा,” असं त्यांनी सांगितलं. मार्केटिंगसाठी जुनी आठवण ताजी करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टोला लगावला. “तुम्ही पुन्हा चित्रपट बनवत असाल, तर नवीन गाणी तयार करा. भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जुन्या वैभवावरच जगायचं, असा संदेश यातून जातो,” असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान,‘बॉर्डर 2’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्याला अरिजीत सिंग, विशाल मिश्रा, दिलजीत दोसांज आणि सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. मूळ गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि संगीत अनु मलिक यांचं होतं. अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

7 गाणी, जबरदस्त कथा अन् अस्सल लोकसंगीत! ‘फुला’चा ट्रेलर एकदा पहाच, लहान वयात खंडोबाशी लग्न अन्..
7 गाणी, जबरदस्त कथा अन् अस्सल लोकसंगीत! ‘फुला’चा ट्रेलर एकदा पहाच, लहान वयात खंडोबाशी लग्न अन्..
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
Shweta Shinde: 'छोटासा कोपरा अन् प्रसाद आणि माझे हॉट सीन्स...' अवघाची संसार मालिकेतील इंटिमेट सीन्सवर श्वेता शिंदे थेटच बोलली
'छोटासा कोपरा अन् प्रसाद आणि माझे हॉट सीन्स...' अवघाची संसार मालिकेतील इंटिमेट सीन्सवर श्वेता शिंदे थेटच बोलली
Raja Shivaji: राजा शिवाजी’ ठरणार गेमचेंजर! अभिषेक बच्चनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; भूमिकेची जोरदार चर्चा
राजा शिवाजी’ ठरणार गेमचेंजर! अभिषेक बच्चनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; भूमिकेची जोरदार चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
Satara Jilha Parishad: 'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
Embed widget