एक्स्प्लोर

28 वर्षानंतर येणाऱ्या बॉर्डर-2साठी जावेद अख्तरांनी गाणी लिहिण्यास दिला स्पष्ट नकार, म्हणाले, 'हे सर्जनशील दिवाळं..'

बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Border 2 Javed Akhtar: 28 वर्षानंतर बॉर्डरचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येत आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर या चित्रपटांना बॉलीवूडच्या वॉर फिल्मचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है' सारख्या अजरामर गाण्यांनी या चित्रपटाला वेगळीच उंची दिली होती.  आता तब्बल 28 वर्षानंतर बॉर्डर 2 मोठ्या पडद्यावर येत असताना या चित्रपटातील गाण्यांविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. पण या सिक्वलमध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे एकही गाणे नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'खरंतर हे सर्जनशील दिवाळं '

बॉर्डर 2 चित्रपटासाठी पुन्हा गाणी लिहाल का असं या चित्रपटाच्या मेकर्सने जावेद अख्तरांना विचारलं होतं. मात्र त्यांना स्पष्ट नकार देत आधीच हित असलेलं गाणं थोडासा बदल करून पुन्हा देणं म्हणजे सर्जनशील दिवाळं आहे असं म्हणत तिखट नकार दिला. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, ‘बॉर्डर 2’साठी गाणी लिहिण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. “मेकर्सनी मला लिहायला सांगितलं होतं, पण मी नकार दिला. मला खरंच वाटतं की हे बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळपण आहे. एखादं जुनं गाणं यशस्वी ठरलं म्हणून त्यात थोडंसं बदल करून ते पुन्हा सादर करणं योग्य नाही. नवीन गाणी तयार करा, अन्यथा मान्य करा की आता तुम्ही तोच दर्जा गाठू शकत नाही,” असं ते म्हणाले.

भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही

जुन्या गाण्यांच्या रिमेकवरही जावेद अख्तर यांनी परखड मत मांडलं. “जे झालं, ते होऊन गेलं. त्याला पुन्हा निर्माण करण्याची गरज काय? आमच्यासमोर ‘हकीकत’सारखा चित्रपट होता. त्यातील ‘कर चले हम फिदा’ आणि ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ ही गाणी अफलातून होती. तरीही आम्ही ती वापरली नाहीत. पूर्णपणे नवीन गाणी लिहिली आणि ती लोकांना आवडलीसुद्धा,” असं त्यांनी सांगितलं. मार्केटिंगसाठी जुनी आठवण ताजी करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टोला लगावला. “तुम्ही पुन्हा चित्रपट बनवत असाल, तर नवीन गाणी तयार करा. भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जुन्या वैभवावरच जगायचं, असा संदेश यातून जातो,” असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान,‘बॉर्डर 2’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्याला अरिजीत सिंग, विशाल मिश्रा, दिलजीत दोसांज आणि सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. मूळ गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि संगीत अनु मलिक यांचं होतं. अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...
Bigg Boss Marathi Season 6: संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
तब्बल 13 वर्षांनंतर अभिजीत सावंतचा प्लेबॅक सिंगर म्हणून कमबॅक; ‘सर सुखाची श्रावणी’नंतर 'हे' खास गाणं रिलीज
तब्बल 13 वर्षांनंतर अभिजीत सावंतचा प्लेबॅक सिंगर म्हणून कमबॅक; ‘सर सुखाची श्रावणी’नंतर 'हे' खास गाणं रिलीज
अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Embed widget