Rama Raghav Serial Raksha Bandhan Special Episode : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता 'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग रंगणार आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधून वचन दिल्याने हा भाग नक्कीच खास असणार आहे.


'रमा राघव' या मालिकेत येत्या मंगळवारी 29 ऑगस्ट आणि बुधवारी 30 ऑगस्टला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या यंदाच्या रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे. ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे.


'रमा राघव'चा विशेष भाग कधी रंगणार? 


'रमा राघव' या मालिकेच्या सुरुवातीपासूनच 'रमा राघव' ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे विशेष चर्चेत आहे. अत्यंत स्वार्थी आई, त्यात वडिलांनी केलेली दोन लग्न यामुळे बिघडलेली, नातेसंबंधावरचा विश्वास उडालेली रमा ते पुरोहित घरातल्या वातावरणाने बदलेली सगळ्यांचा विचार करणारी, संस्कारी रमा हा टप्पा प्रेक्षकांना विस्मयचकीत करणारा ठरला आहे.'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग 29 आणि 30 ऑगस्टला रात्री 9 वाजता रंगणार आहे.


माणूस बदलू शकतो, त्याला योग्य संस्कार आणि संगत याची जोड मिळायला हवी. हा पुरोहितांचा विश्वास रमाने सार्थ ठरवला. याचीच एक पुढची पायरी गाठत रमाने तिची सावत्र बहीण आरुषी सोबत  बहीण म्हणून छान नाते फुलवले आहे. या नात्यालाच यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्यात एक लोभसवाणे वळण मिळणार असून रमाच्या आग्रहातून छोटी बहीण आरुषी, मोठी बहीण रमाला राखी बांधणार आहे. जिथे रमा तिच्या रक्षणाचे वचन देते. 


सध्या ही मालिका रमाराघवच्या नात्याला रमाच्या आईच्या असलेल्या टोकाच्या विरोधाच्या टप्प्यावर आहे, रमाच्या आईने ज्या वरुणसोबत रमाचे लग्न ठरवले आहे, तो आरुषीच्या प्रेमात असून वरुण – आरुषीने लग्न करायचे ठरवले आहे, ज्याला रमाचा पाठिंबा आहे. रक्षाबंधनाच्या या वचनामुळे हा नात्यांचा गुंता अधिकच रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. 


'रमा राघव' मालिकेबद्दल जाणून घ्या...


'रमा राघव' या मालिकेतील खट्याळ रमा आणि प्रेमळ राघव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची तिखट गोड गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आयुष्यात आदर्श, तत्त्व, मूल्य यांचं महत्त्व नव्या पिढीला हलक्या फुलक्या रितीने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जात आहे. 


संबंधित बातम्या


Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग