एक्स्प्लोर

...म्हणून लतादीदींनी लग्न केलं नाही!

गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस. लतादीदींनी लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती.

मुंबई : भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस. लतादीदींनी लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती.  “ज्यावेळी मी 4-5 वर्षांची होते. तेव्हा किचनमध्य जेवण बनवत असणाऱ्या आईला स्टूलवर उभी राहून गाणं गाऊन दाखवतं असे. तोपर्यंत माझ्या या आवडीबद्दल वडिलांना माहितही नव्हतं”, असे लतादीदींनी एकदा ‘बीबीसी’च्या मुलाखतीत सांगितलं होतं. 20 भारतीय भाषा... 50 हजारहून अधिक गाणी... जवळपास सहा दशकं आपल्या आवाजाने 20 भारतीय भाषांमध्ये 50 हजारहून अधिक गाणी गाऊन ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये लतादीदींच्या नावाची नोंद झाली आहे. 89 वर्षीय लतादीदी आजही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आजही त्यांनी गायलेल्या गाण्यांनी मनाला भुरळ पडते. लता मंगेशकर अशा व्यक्ती आहेत, ज्या हयात असताना त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. 28 सप्टेंबर म्हणजे आज त्यांचा 89वा वाढदिवस आहे. ..आणि हेमाची लता झाली! लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये जन्मलेल्या लतादीदी या पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या. लता मंगेशकर यांचं पहिलं नाव ‘हेमा’ होतं. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांनी त्यांचं नाव ‘लता’ ठेवलं. लतादीदी त्यांच्या भावंडांमध्ये थोरल्या आहेत. मीना, आशा, उषा आणि सर्वात लहान ह्रदयनाथ मंगेशकर, असा लतादीदींच्या भावंडांचा गोतावळा आहे. लतादीदींचे वडील म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर हे नाट्यकलावंत आणि गायक होते. पहिली कमाई... पहिला ब्रेक... पहिलं हिट गाणं... लतादीदींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्याचे 25 रुपये मिळाले होते आणि याच 25 रुपयांना आपली पहिली कमाई त्या मानतात. 1942 साली ‘किती हासाल’ या मराठी सिनेमातील गीत गाऊन त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं. 1949 मध्ये महल सिनेमातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांची हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर राज कपूर यांच्या ‘बरसात’मधील ‘जिया बेकरार है’, ‘हवा में उडता जाए’सारख्या गाण्यांमुळे लता मंगेशकर हे नाव हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी गायक-गायिकांच्या यादीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचलं आणि ते आजतागायत पहिल्याच स्थानावर आहे. मान-सन्मान लता मंगेशकर यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या करिअरमध्ये एकूण चारवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1972 साली ‘परिचय’, 1975 साली ‘कोरा कागज’ आणि 1990 साली ‘लेकिन’  या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. याशिवाय, लता मंगेशकर यांना 1969 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 मध्ये पद्मविभूषण, 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्नने त्यांचा सन्मान झाला. लतादीदी विवाहाच्या बंधनात का अडकल्या नाहीत? लहाणपणी कुंदनलाल सहगल यांच्या एका सिनेमात चंडीदास यांना पाहून लतादीदी म्हणत असत की, मोठ्या झाल्यावर चंडीदास यांच्याशी लग्न करेन. मात्र, लतादीदी अविवाहित राहिल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की, घरची जबाबदारी असल्यानं लग्न करण्याचा विचारही मनात आला नाही. लतादीदी चप्पल काढून स्टुडिओत जात असत... सुरेल आवाज आणि साध्या राहणीमुळे जगात ओळखल्या जाणाऱ्या लतादीदी आजही गाण्यच्या रेकॉर्डिंगवेळी स्वत:ची चप्पल काढून स्टुडिओत जातात. विष पाजून मारण्याचा प्रयत्न 1962 मध्ये जेव्हा लतादीदी 32 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांना स्लो पॉईजन देण्यात आलं होतं. लतादीदी यांच्या निकटवर्तीय पद्मा सचदेव यांनी ‘ऐसा कहाँ से लाऊं’ या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे. त्यानंतर लेखक मजरुह सुल्तानपुरी अनेक दिवस लतादीदींच्या घरी जाऊन स्वत: जेवण चाखून मग लतादीदींना देत असत, असेही पद्मा सचदेव यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र, लतादीदींना मारण्याचा का प्रयत्न झाला, हे अद्याप उघड झालं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
The Ring Star Daveigh Chase Dies: सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर
सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर
Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget