एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगना रणौतचा सवाल, सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांना भारतात...

Kangana Ranaut : कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले.

Kangana Ranaut  :   भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi Lok Sabha) लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवर टीका करताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती.  त्यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सूर्य असून विरोधी पक्ष नेते मेणबत्तीच असल्याचे कंगनाने म्हटले.  कंगनाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे तिने म्हटले. 

'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने म्हटले की, विरोधी पक्षातील नेते हे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात बुडाले आहेत. हे सगळे एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही त्यांची पंतप्रधान मोदींसोबत तुलना केल्यास पीएम मोदी हे सूर्य आहे तर विरोधी पक्ष नेते  मेणबत्तीदेखील नाही असेही कंगनाने म्हटले.

नेताजी बोस यांना पंतप्रधान का केले नाही?

कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाने म्हटले की, एका व्यक्तीने आपले रक्त सांडून स्वातंत्र्य दिले. जर्मनी ते जपानपर्यंत स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही,  अखेर ते कुठे अचानक अदृश्य झाले असा सवाल कंगनाने केला. जे तुरुंगात बसून टीव्ही पाहायचे ते सरकारमध्ये आले. आझाद हिंद फौजेच्या जवानांना कारवाईला सामोरे जावे लागले, अनेकजणांना गायब करण्यात आले असल्याचा दावाही कंगनाने केला. 

कंगनाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कंगनाचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे. एकदा कंगनाने आपल्या देशाला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले असल्याचे म्हटले. याबाबत निगडीत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने म्हटले की, लोक मला अशा काही गोष्टींवर ट्रोल करू शकतात.अशा लोकांनी माझ्यासोबत येऊन चर्चा कराव आणि सांगावे मी काय चुकीचे बोलले? स्वातंत्र्य म्हणजे तुरुंगातून बाहेर येण्यापर्यंत मर्यादित आहे का? आधीच्या सरकारने कोणतीही नवीन न्याय व्यवस्था लागू केली नाही. आपल्याला विचारसरणीपासून स्वातंत्र्य मिळाले नाही. विचार करण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. आपले प्रतिनिधीत्व करणारी लोक निवडण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. इतकंच नव्हे तर धार्मिक स्वातंत्र्यदेखील मिळाले नसल्याचे कंगनाने म्हटले. 

...म्हणून राजकारणात उतरलीस का?

चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात आलीस का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने म्हटले की, शाहरुखचे चित्रपट 10 वर्ष फ्लॉप झाली. मग, पठाण सुपरहिट झाला. माझेही 7-8 चित्रपट फ्लॉप झाले, मग क्वीन चित्रपट हिट झाला. मग, त्याच्या 3-4 वर्षांनी मणिकर्निका चित्रपट हिट झाला. आता एर्मजन्सी प्रदर्शित होणार आहे, कदाचित हा सगळ्यात मोठा हिट चित्रपट असू शकतो, असेही तिने म्हटले. सध्या काळ बदलला असून ओटीटीचा जमाना आहे. कलाकारांकडे आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. 

सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर काय म्हणाली कंगना?

कंगनाने म्हटले की, आपण महिला सशक्तीकरणावर काम करतो. मंडी लोकसभा मतदारसंघाला अशा प्रकारे संबोधित करणे दुखावणारे आहे. मंडी हे नाव महर्षी मांडव यांच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे तिने म्हटले. हिमाचल मधील जनता त्या टिप्पणीने नाराज झाली असल्याचे तिने म्हटले. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget