एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगना रणौतचा सवाल, सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांना भारतात...

Kangana Ranaut : कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले.

Kangana Ranaut  :   भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi Lok Sabha) लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवर टीका करताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती.  त्यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सूर्य असून विरोधी पक्ष नेते मेणबत्तीच असल्याचे कंगनाने म्हटले.  कंगनाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे तिने म्हटले. 

'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने म्हटले की, विरोधी पक्षातील नेते हे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात बुडाले आहेत. हे सगळे एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही त्यांची पंतप्रधान मोदींसोबत तुलना केल्यास पीएम मोदी हे सूर्य आहे तर विरोधी पक्ष नेते  मेणबत्तीदेखील नाही असेही कंगनाने म्हटले.

नेताजी बोस यांना पंतप्रधान का केले नाही?

कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाने म्हटले की, एका व्यक्तीने आपले रक्त सांडून स्वातंत्र्य दिले. जर्मनी ते जपानपर्यंत स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही,  अखेर ते कुठे अचानक अदृश्य झाले असा सवाल कंगनाने केला. जे तुरुंगात बसून टीव्ही पाहायचे ते सरकारमध्ये आले. आझाद हिंद फौजेच्या जवानांना कारवाईला सामोरे जावे लागले, अनेकजणांना गायब करण्यात आले असल्याचा दावाही कंगनाने केला. 

कंगनाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कंगनाचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे. एकदा कंगनाने आपल्या देशाला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले असल्याचे म्हटले. याबाबत निगडीत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने म्हटले की, लोक मला अशा काही गोष्टींवर ट्रोल करू शकतात.अशा लोकांनी माझ्यासोबत येऊन चर्चा कराव आणि सांगावे मी काय चुकीचे बोलले? स्वातंत्र्य म्हणजे तुरुंगातून बाहेर येण्यापर्यंत मर्यादित आहे का? आधीच्या सरकारने कोणतीही नवीन न्याय व्यवस्था लागू केली नाही. आपल्याला विचारसरणीपासून स्वातंत्र्य मिळाले नाही. विचार करण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. आपले प्रतिनिधीत्व करणारी लोक निवडण्याचेही स्वातंत्र्य मिळाले नाही. इतकंच नव्हे तर धार्मिक स्वातंत्र्यदेखील मिळाले नसल्याचे कंगनाने म्हटले. 

...म्हणून राजकारणात उतरलीस का?

चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात आलीस का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने म्हटले की, शाहरुखचे चित्रपट 10 वर्ष फ्लॉप झाली. मग, पठाण सुपरहिट झाला. माझेही 7-8 चित्रपट फ्लॉप झाले, मग क्वीन चित्रपट हिट झाला. मग, त्याच्या 3-4 वर्षांनी मणिकर्निका चित्रपट हिट झाला. आता एर्मजन्सी प्रदर्शित होणार आहे, कदाचित हा सगळ्यात मोठा हिट चित्रपट असू शकतो, असेही तिने म्हटले. सध्या काळ बदलला असून ओटीटीचा जमाना आहे. कलाकारांकडे आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. 

सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर काय म्हणाली कंगना?

कंगनाने म्हटले की, आपण महिला सशक्तीकरणावर काम करतो. मंडी लोकसभा मतदारसंघाला अशा प्रकारे संबोधित करणे दुखावणारे आहे. मंडी हे नाव महर्षी मांडव यांच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे तिने म्हटले. हिमाचल मधील जनता त्या टिप्पणीने नाराज झाली असल्याचे तिने म्हटले. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Embed widget