एक्स्प्लोर

Aishwarya-Abhishek Love Story: ऐश्वर्यानं अभिषेकच्या आधी झाडासोबत केलं लग्न? अमिताभ बच्चन म्हणाले...

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांची लव्हस्टोरी हटके आहे.  जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...

Aishwarya-Abhishek Love Story: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे. ऐश्वर्यानं बॉलिवूडमध्ये  विशेष ओळख निर्माण केली आहे.  अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांची लव्ह स्टोरी हटके आहे.  जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...

पहिली भेट


1997 मध्ये जेव्हा ऐश्वर्या  ही 'और प्यार हो गया'  या चित्रपटात अभिषेकचा मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकदा भेट झाली होती. 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या हे भेटले होते. दोघांनी  ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.  तेव्हा ऐश्वर्या ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि 2002 मध्ये अभिषेकचे करिश्मा कपूरसोबत लग्न होणार होते. पण, काही कारणास्तव करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न होऊ शकले नाही.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पडले प्रेमात (Aishwarya Rai And Abhishek Bachchan Love Story)

ऐश्वर्या आणि सलमान खानचा ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या ही विवेक ओबेरॉयच्या प्रेमात पडली होती. पण त्यांचे देखील काही कारणांमुळे ब्रेकअप झाले. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकमेकांच्या प्रेमात पडले.2006 मध्ये  ऐश्वर्या आणि अभिषेकला खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. त्यावेळी 'उमराव जान' व्यतिरिक्त दोघेही 'गुरू' आणि 'धूम 2' या चित्रपटांमध्ये  एकत्र काम करत होते. ऐश्वर्याच्या प्रेमात पडलेल्या अभिषेकने अखेर तिला लग्नासाठी प्रपोज केले.

बाल्कनीत केले प्रपोज

अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी न्यूयॉर्कमध्ये  असताना हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभी राहायचो आणि विचार करायचो की एक दिवस मी तिच्याशी लग्न करू शकले तर किती छान होईल." न्यूयॉर्कमधील त्याच हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकनं ऐश्वर्याला नेले आणि लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर ऐश्वर्यानं होकार दिला. 

अभिषेकच्या आधी ऐश्वर्यानं झाडासोबत केलं लग्न?

 न्यूयॉर्कवरुन दोघेही मुंबईला परतले, तेव्हा 14 जानेवारी 2007 रोजी त्यांनी लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्यानं एका झाडासोबत लग्न केलं, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. त्या काळात असं म्हटलं जात होतं की, एका प्राचीन विधीमध्ये दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्यानं एका झाडाशी लग्न झालं होतं.  यासर्व चर्चांवर 2007 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं,  " ते झाड कुठे आहे? कृपया मला ते दाखवा. ज्याच्यासोबत तिने लग्न केले आहे तो माझा मुलगा आहे.  तुम्हाला अभिषेक झाड आहे असं वाटतं का?." 2016 मध्ये अभिषेकनं ट्वीट केलं होतं, "आणि फक्त रेकॉर्डसाठी, आम्ही अजूनही हे झाड शोधत आहोत" 

इतर महत्वाच्या बातम्या:

Aishwarya-Abhishek Love Story: चित्रपटाच्या सेटवर पडले प्रेमात; बाल्कनीत केले प्रपोज; अशी आहे ऐश्वर्या आणि अभिषेकची प्यारवाली लव्हस्टोरी

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget