एक्स्प्लोर

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात देशभरातील 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.42 टक्के तर काश्मीरमध्ये सर्वात कमी 17.07 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सोमवारी 7 राज्यांतल्या 51 जागांवर मतदान पार पडलं आहे. दिवसअखेर या 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. रायबरेलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये अटीतटीची लढत आहे. त्यामुळे आज मतदारराजाने कुणाला कौल दिलाय हे 23 मे रोजीच कळणार आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 674 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंद केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.42 टक्के तर काश्मीरमध्ये सर्वात कमी 17.07 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे. सात राज्यांतील सरासरी आकडेवारी बिहार 57.76 % जम्मू आणि काश्मीर 17.07 % झारखंड 64.60 % मध्य प्रदेश 64.61 % राजस्थान 63.69 % उत्तर प्रदेश 57.06 % पश्चिम बंगाल 74.42 % दिग्गजांचं मतदान क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षीसोबत रांचीच्या जवाहर विद्या मंदिरमध्ये मतदान केलं. तर अभिनेता आशुतोष राणा यांनी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही लखनौमध्ये मतदान केलं, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही सहकुटुंब जयपूरच्या टागोर शाळेत मतदान केलं. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पत्नीसह हजारीबगेत मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या राजनाथ सिंह, राजवर्धन राठोड, जयंत सिन्हा यांचं भवितव्यही आज ईव्हीएमध्ये बंद झालं आहे. तर लखनौमध्ये राजनाथ सिंह यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचं आव्हान आहे. अमेठीत बूथ कॅप्चरिंगचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. अमेठीतून गायब असलेले राहुल गांधी आज मतदान केंद्र बळकावण्यासाठी आल्याचा गंभीर आरोप त्यांनी राहुल गांधींवर केलाय. एका वृद्ध महिलेचा व्हिडीओही त्यांनी ट्वीट केला आहे. अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे. पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये मतदानावेळी राडा पाचव्या टप्प्यात मतदानावेळी पश्चिम बंगालच्या बैरकपूर आणि हावडामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह जखमी झाले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बूथ बळकावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. दुसरीकडे काश्मीरच्या पुलवामामध्येही मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Embed widget