एक्स्प्लोर

'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला

Rohit Patil: वचननामात शेती, शिक्षण आणि विशेषतः तासगाव-कवठे मंकाळमधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिले आहे. निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय आहे.

Rohit Patil: सांगली जिल्हा परिषद  आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटील यांनी "ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा" ही टॅगलाईन निश्चित केली आहे. विधानसभेला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले, तसाच विश्वास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांवर ठेवावा, असे आवाहन रोहित पाटील यांनी केलं आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्या तरी आम्ही या निवडणुका तुतारी चिन्हावर लढवू असेही रोहित पाटील म्हणाले. तासगाव नगरपालिका विरोधकांनी जिंकल्यामुळे या निवडणुकीत आम्हाला फार मोठे आव्हान निर्माण होईल असं वाटत नाही असेही रोहित पाटील म्हणालेत.

आधी लगीन कोंढाण्याचं

रोहित पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्य शासनाचा निधी आणि इतर प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदारसंघात चांगली कामे आणली आहेत. झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच हे सर्व घटक आपल्या विचारांचे असल्यास काम अधिक गतीने होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. लग्नाविषयीच्या चर्चेवर उत्तर देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील संदर्भाचा वापर करत "आधी लगीन कोंढाण्याचं" (म्हणजेच आधी निवडणुकीत विजय मिळवणे) ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

जाहीरनाम्यात आहे तरी काय?

वचननामात शेती, शिक्षण आणि विशेषतः तासगाव-कवठे मंकाळमधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिले आहे. द्राक्ष शेतीशी संबंधित उद्योग न आल्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय आहे. हा जाहीरनामा गेल्या आठ वर्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अभ्यासातून तयार केला आहे. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, CSR (Corporate Social Responsibility) मधून उपलब्ध होणाऱ्या फंडाच्या माध्यमातून सेवेचे काम करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील

रोहित पाटील यांनी स्पष्ट केले की, पक्षाचे 'मुख्य प्रतोद' असल्याने पक्षाशी सुसंगत निर्णय घेणे जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील. हा निर्णय मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या यशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः कर्तृत्ववान असल्याने ते निवडून आले, त्यात कोणाच्या मदतीचा मोठा भाग नव्हता. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता, "दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करून पुढे जायचे" असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget