![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajya Sabha Election 2022 : तुम्ही फक्त मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील
Devendra Fadanvis : भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येईल याचे सर्व नियोजन आम्ही केले आहे असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
![Rajya Sabha Election 2022 : तुम्ही फक्त मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील Rajya Sabha Election 2022 Devendra Fadanvis adress to BJP MLA on Election Rajya Sabha Election 2022 : तुम्ही फक्त मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/75ad8ca65f31ba7d5d5d534d0371edf1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मी जसं सांगतोय, तुम्ही फक्त तसं मतदान करा, आपला तिसरा उमेदवार निवडून येईल अशा सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) भाजप आमदारांना केल्या आहेत. आपलं मत बाद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज ताज प्रेसिडेन्सीमध्ये बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं.
देवेंद्र फडणवीस आमदारांना संबोधित करताना म्हणाले की, "तुम्ही फक्त मी सांगतोय तसं मतदान करा. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येईल याचे सर्व नियोजन आम्ही केले आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, तुम्ही फक्त तुमचे मत बाद होणार नाही याची काळजी घ्या."
शुक्रवारी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक एकमेकांसमोर उभे असून एक-एक मत हे महत्त्वाचं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची आज ताज प्रेसिडेन्सीमध्ये बैठक झाली. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना संबोधित केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं.
संख्याबळानुसार काय स्थिती?
राज्यसभेतील निवडणुकीसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपला देखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटींची होणार असल्याचे म्हटलं जात आहे. शुक्रवारी ही निवडणूक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)