एक्स्प्लोर

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचं स्वरुप बदललं, केंद्राच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर फडणवीस-चव्हाणांची स्तुतीसुमने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत स्तुतीसुमने वाहिली आहेत.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 26 मे 2026 रोजी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची यशस्वी 12 वर्षे पूर्ण केली आहेत. मोदींच्या या दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेच्या एका तपानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या गेल्या 12 वर्षांतील कामगिरीवर स्तुतीसुमने वाहिली.

देशाचा आणि महाराष्ट्राचा GDP तिप्पट ते चौपट वाढला

या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींचे 12 वर्षांतील कार्य एवढे मोठे आहे की ते एका पुस्तकात मांडणे कठीण आहे. देशातील 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले आहे. भारताचा जीडीपी (GDP) 2013-14 मध्ये 103 लाख कोटी रुपये होता, तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच थेट तिप्पट वाढला आहे.

तसेच महाराष्ट्राचा जीडीपी (Maharashtra GDP) 2013-14 मधील 13 लाख कोटींवरून 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढला आहे. हा विकास केवळ घोषणांनी झाला नसून त्यामागे मोदींची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती आहे."

भारताची 'मेक फॉर वर्ल्ड'च्या दिशेने वाटचाल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, देशात फक्त सरकारी अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभे करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. मोदींनी देशात 'मेक इन इंडिया' (Make in India) ही चळवळ यशस्वीरित्या राबवून आता भारताची वाटचाल 'मेक फॉर वर्ल्ड'च्या दिशेने सुरू केली आहे. हर घर शौचालय आणि उज्वला गॅस योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या माणसाला सन्मानाचे आयुष्य मिळाले आहे.

मोदीजी म्हणजे राष्ट्रसेवेसाठी समर्पित 'राष्ट्र तपस्वी'

या सोहळ्यादरम्यान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. चव्हाण म्हणाले, "काही व्यक्ती अध्यात्मातून तपस्या करतात, तर काही कला-साहित्यातून समाजासाठी जगतात; पण मोदीजींनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे, म्हणूनच ते खरे 'राष्ट्र तपस्वी' आहेत.

गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकरी, कामगार, गरीब आणि वंचितांच्या बँक खात्यांपर्यंत पोहोचला आहे."

काय आहे या विशेष संग्राह्य अंकात?

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली की, 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' हा केवळ एक अंक नसून नव्या भारताच्या परिवर्तनाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या पुस्तकात अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत आणि विकसित भारत 2047 (Developed India 2047) यांसारख्या 12 महत्त्वाच्या विषयांवर तथ्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेला प्रभाव आणि सीमांवर शत्रूला दिलेले सडेतोड उत्तर यावरही यात विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

या दिमाखदार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे आणि आमदार सुनील राणे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget