एक्स्प्लोर

Maharashtra Exit Poll Results: मविआ आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर, लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही आघाड्या सत्तेजवळ

Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.

Maharashtra Election Exit Polls Result 2024 मुंबई :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सरासरी 58.45 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.    

महाविकास आघाडी अन् महायुतीमध्ये कांटे की टक्कर

लोकशाही मराठी- रुद्र  यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही आघाड्या सत्तेजवळ आहेत. कोणत्याही एका आघाडीला त्यांनी बहुमताच्या 144 जागांपेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवला नाही. महायुतीला 142 जागांपर्यंत तर महाविकास आघाडीला 140 जागांजवळ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांच्या खात्यात 18 ते  23 जागा जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 
लोकशाही मराठी-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 18 ते 23 जागा मिळू शकतात. 

लोकशाही रुद्र नुसार कुणाला किती जागा? (पक्षनिहाय अंदाज)

महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23

महाराष्ट्रात कोण किती जागा लढलं?

महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 85 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 जागा लढवल्या होत्या. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 101, शिवसेना ठाकरे पक्षानं 95 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 87 जागा लढवल्या होत्या. 

प्रत्यक्ष मतमोजणी कधी ?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज पार पडलं आहे.  आता विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 

 दरम्यान, विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीचा अंदाज पाहिला असता बहुतांश पोल नुसार महायुतीचं सरकार राज्यात येऊ शकतं. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपनं सर्वाधिक 149 जागा लढवल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागू शकतं असं देखील एक्झिट पोलच्या अंदाजामधून दिसून येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, अशी शक्यात एक्झिट पोलनं वर्तवली आहे. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget