एक्स्प्लोर

'हे' उमेदवार ठासून नाही तर घासून आले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही उमेदवार हे 400 ते 1500 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही उमेदवार हे 400 ते 1500 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. मनसे सोडून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक दिलीप लांडे मुंबईतल्या चांदीवली मतदारसंघातून निवडणूक लढले. या मतदारसंघात लांडे यांनी निसटता विजय मिळवला आहे. लांडे यांना 85 हजार 879 इतकी मतं मिळाली आहेत. तर त्यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या नसीम खान यांचा पराभव केला आहे. नसीम खान यांना 85 हजार 470 इतमी मतं मिळाली. दिलीप लांडे यांनी अवघ्या 409 मतांनी विजय मिळवला आहे. पुण्यातल्या दौंड मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या राहुल कुल यांनी 673 मताधिक्याने विजय मिळवला आहे. कुल यांना 1 लाख 3 हजार 664 मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या रमेश थोरात यांना 1 लाख 2 हजार 918 मतं मिळाली आहेत. सांगोल्यातही चुरशीची लढत पाहायला मिळाली. सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 768 मताधिक्याने पराभव केला आहे. शहाजीबापूंना 99 हजार 464 मतं मिळाली आहेत. तर अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 इतकी मतं मिळाली आहेत. अहमदनगरमधल्या कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांनी अवघ्या 822 मताधिक्याने भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला आहे. काळे यांना 87 हजार 566 तर कोल्हे यांना 86 हजार 744 मतं मिळाली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभेच्या निवडणुकीतही चुरशीची लढत पाहायला मिळाली. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी दिली. त्यामुळे बीडमध्ये काका-पुतण्यामध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेत संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. परंतु हा विजय संदीप यांच्यासाठी सोपा नव्हता. अवघ्या 1786 मताधिक्याने त्यांनी विजय मिळाला आहे. संदीप क्षीरसागर यांना 99 हजार 934 मतं मिळाली आहेत. तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 इतकी मतं मिळाली आहेत. पाहा निसटत्या विजयाबाबत काय म्हणत आहेत संदीप क्षीरसागर? बोरीवली मतदारसंघात दहा हजार मतं नोटाला, विनोद तावडेंना काय वाटतं? | ABP Majha 'हे' आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
NCP Vidhan Parishad : राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?

व्हिडीओ

Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Embed widget