एक्स्प्लोर

Lok Sabha Exit Poll 2024: ममता बनर्जींना पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता, लोकसभेला जागा घसरणार? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?  

 ABP Cvoter Lok Sabha Exit Poll 2024: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कांग्रेसच्या जागा घटल्या आहेत. भाजपला 2019 मध्ये 18 जागा मिळाल्या होत्या. 

ABP Cvoter Exit Poll 2024 कोलकाता : देशातील सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला देशभरात विविध राज्यात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील एक्झिट पोलचा अंदाज या प्रमाण आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. तर, भाजपच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे.  

एबीपी सी-वोटर ने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. पश्चिम बंगालमधील 42 जागांसाठी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार भाजप प्रणित एनडीएला 23 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, तृणमूल काँग्रेसला 13-17 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला 1-3 जागांवर यश मिळू शकतं. 

एक्झिट पोलचे अंदाज आणि 2014  आणि 2019 च्या निवडणूक निकालांची तुलना केल्यास यावेळी टीएमसीला मोठा धक्का बसू शकतो. टीएमसीला 2019 च्या निवडणुकीत 12 जागांचा फटका बसला होता. तर भाजपच्या जागा वाढल्या होत्या. 2019 ला भाजपच्या 16 जागा वाढल्या होत्या. 

2014 मध्ये टीएमसीला 34 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019 मध्ये टीएमसीला 22 जागा मिळाल्या होत्या. आता 2024 मध्ये टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. टीएसीला 13-17 जागा मिळू शकतात.  

भाजपला 2014 लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 2 जागांवर विजय मिळवला होता.2019 ला भाजपला लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळाल्या होत्या. 2014 ते 2019  मध्ये भाजप 2 जागांवरुन पश्चिम बंगालमध्ये 18  जागांवर पोहोचलं होता. 

भाजपला मोठं यश मिळणार? 

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपनं गेल्या दोन निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठं यश मिळवलं आहे. आता या निवडणुकीत टीएमसीला धक्का देत भाजप यश मिळवणार का हे पाहावं लागेल. याशिवाय देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएचं सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजात वर्तवण्यात आला आहे. भाजप स्वबळावर 315 जागा मिळवेल, असा अंदाज एबीपी सी वोटरनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेसला देखील गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागांचा फायदा दिसतोय. काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, एबीपी सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार केंद्रात भाजपला मोठं यश मिळू शकतं. एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या इतर संस्थांच्या आकडेवारीनुसार देखील भाजप प्रणित एनडीएची पुन्हा एकदा सत्ता केंद्रात येऊ शकते. 

संबंधित बातम्या :

ABP Cvoter Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज

Nagpur Lok Sabha Exit Poll 2024 : विदर्भात कुणाचा झेंडा फडकणार? नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश, आता भाजप अन् शिवसेनेचे संकटमोचक तडकाफडकी नाशिकला आले; गोकुळ गीते काय निर्णय घेणार?
बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश, आता भाजप अन् शिवसेनेचे संकटमोचक तडकाफडकी नाशिकला आले; गोकुळ गीते काय निर्णय घेणार?
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget