एक्स्प्लोर

Ajit Pawar exit From Mahayuti: कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाचा चक्रव्यूह?

Ajit Pawar in Mahayuti: येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज होऊन महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच चक्रव्यूह रचल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार काय करणार?

मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राज्यातील जनतेची नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्याने अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे काका शरद पवार (Sharad Pawar) यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोट नव्याने आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे. अशा पडत्या काळात महायुतीमधील (Mahayuti) दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील, ही अजित पवार यांची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच (Shivsena Shinde Camp) चक्रव्यूह रचल्याची चर्चा असून अजितदादा या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे सांगितले जात आहे. 'दैनिक लोकसत्ता'ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. 

या वृत्तानुसार महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार, हे स्पष्ट आहे. तसे न झाल्यास महायुतीत बाका प्रसंग उद्भवू शकतो. यादृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याची माहिती 'दैनिक लोकसत्ता'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 

भाजप आणि शिंदे गटाचा नेमका प्लॅन काय?

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे नेते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचली नव्हती. याविरोधात दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करु, असा इशाराही अजितदादा गटाने दिला होता. मात्र, 'अजित पवार यांना जिथे कुठे तक्रार करायची असेल तिथे करु द्या' असे म्हणत नितेश राणे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे समर्थन केले होते. त्यामुळे नितेश राणेंबाबतच्या अजित पवार यांच्या तक्रारीला भाजप फारशी किंमत देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. भाजपच्या अनिल बोंडे यांनीही गायकवाडांच्या या वक्तव्याची री ओढली होती. याबाबतही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, भाजप नेतृत्व अजित पवार यांच्या नाराजीची कितपत दखल घेईल, याबाबत साशंकताच आहे. 

किंबहुना महायुतीमध्ये अजित पवार यांची कोंडी व्हावी, यासाठीच अशाप्रकारची रणनीती वापरली जात असल्याचे मानले जात आहे. जेणेकरुन भाजप आणि शिंदे गटाचे कट्टर हिंदुत्त्व आणि विरोधकांना नेस्तनाबुत करण्याची पद्धत अजित पवार यांना मान्य नसेल तर त्यांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल, असा अप्रत्यक्ष संदेश भाजप आणि शिंदे गटाकडून दिला जात असल्याची चर्चा आहे.

अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर किंगमेकर होणार?

अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास विधानसभा निवडणुकीला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व जागांवर उमेदवार उभे करता येतील. अशावेळी अजित पवार यांनी स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर 15 ते 20 आमदार निवडून आणले तरी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण होऊ घातलेल्या संभाव्य त्रिशंकू परिस्थितीत अजित पवार किंगमेकर ठरु शकतात. त्यावेळी अजित पवार यांना हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेता येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आणखी वाचा

... तर राजकारणातून निवृत्ती घेईन; अजित पवारांनी खडसावल्यानंतर उमेश पाटलांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?
मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jalil On Tiranga Rally : नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, जलील यांची आजपासून तिरंगा रॅलीसकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 23 Sept 2024Sangli Rain : दुष्काळी भागात पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर, द्राक्ष बागांसह पिकांनाही फटकाSangli Rain : निष्काळजीपणा नडला!सांगलीत भर पावसात पुल ओलांडणारा तरुण गेला वाहून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?
मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?
विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच...
Mumbai News: मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, माज दाखवणाऱ्या टीसी आशिष पांडेला रेल्वेने घरी पाठवलं
मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, माज दाखवणाऱ्या टीसी आशिष पांडेला रेल्वेने घरी पाठवलं
Sanjay Raut: अजित पवारांची गरज संपल्याने भाजपकडून त्यांचा काटा काढण्याचा प्लॅन, एकनाथ शिंदेंबाबतही दिल्लीत चर्चा: संजय राऊत
भाजपकडून महाराष्ट्र, झारखंडच्या निवडणुकीच्या खर्चाचा भार एकनाथ शिंदेंवर; अजितदादांची गरज संपलेय: संजय राऊत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब,  पोलिसांकडून एकाला अटक
कोल्हापूरमध्ये बड्या चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, 25 किलो चांदी गायब, पोलिसांकडून एकाला अटक
Shani 2024 : ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
ऐन नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार; 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार प्रचंड वाढ
Embed widget