एक्स्प्लोर

मोदी, शाह मुद्द्यांवर न बोलता लोकांचं लक्ष भरकटवत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल

आम्ही कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलतो आणि त्यावर काम करत आलो. मात्र सरकार हे सर्व सोडून फक्त लोकांचे लक्ष भटकवण्याचे काम करत आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.

लातूर : इस्रोची सुरुवात आम्ही(काँग्रेस) केली, मात्र आम्ही कधी त्यांच्या कामावर बोललो नाही. आम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवायचे होते. मात्र विद्यमान सरकार कायमच चांद्रयान मोहिमेवर बोलत आहे. सरकारने देशासमोरील प्रश्नांवर काय उपाययोजना केल्या हे सांगता येत नाही हे त्यांचं अपयश आहे. ते झाकण्यासाठीच मग पळवाटा काढत आहेत, अशी टीका काँग्रेस राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे. राहुल गांधी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील औसा येथे आले होते.

देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे का? कर्जमाफी झाली आहे का? आरोग्याचे प्रश्न मिटले आहेत का? शेतकरी आत्महत्या थांबल्या का? शिक्षणाच्या समस्या मिटल्या का? असे अनेक प्रश्न सभेला आलेल्या लोकांना विचारुन राहुल गांधींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी नोटबंदी, जीएसटी, पाकिस्तान-चीन बरोबरचे संबंध, चिनीवस्तू यावरही भाष्य केलं.

आम्ही कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलतो आणि त्यावर काम करत आलो. मात्र सरकार हे सर्व सोडून फक्त लोकांचे लक्ष भरकटवतण्याचे काम करत आहे. देशात सध्या दोन हजार पेक्षा जास्त कारखाने बंद पडले आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणातील चुकांमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. भविष्यकाळात यापेक्षा वाईट वेळ येणार आहे. बँका बुडत चालल्या आहेत. या सरकारने श्रीमंतांना आपल्या पाठीशी घातलं, तर सर्वसामान्यांना लुटलं आहे. मोठ्या व्यापाऱ्यांची कोट्यवधींची कर्ज माफ केली जात आहेत, मात्र सामान्यांना वेगळा न्याय लावला जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

देशासमोर सर्व बाजूंनी संकटे असताना हे भाजपचे नेते चांद्रयान, पाकिस्तान यावरच बोलत आहेत. आम्हाला रॉकेट नको भाकर द्या, कारण आज आम्हाला रोजगाराची जास्त गरज आहे. मात्र मोदी, शाह हे लोकांचे कायमच लक्ष भटकवतात, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. या सभेला काँग्रेसचे नेते मलिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, बाळासाहेब थोरात यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हजर होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका

व्हिडीओ

Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget