एक्स्प्लोर

Maharashtra Board 10th Result : नागपूर जिल्हा विभागात अव्वल, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के घट; विभागाचा निकाल 97 टक्के

नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला असून विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्हा अव्वल आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी सुमारे 2 टक्क्यांनी घसरली झाली आहे.

नागपूर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला. राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. गेल्या वर्षी निकालाचा टक्का 99.84 इतका होता. विशेष म्हणजे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून विभागात 98.18 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

विभागातही मुलीच अव्वल 

बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत कमी संख्येने बसूनही जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण झाल्या आहे. यामध्ये यावर्षी 78 हजार 987 मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी 75 हजार 739 मुले उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी 95.88 इतकी आहे. याशिवाय दहावीची परीक्षा 74 हजार 752 मुलींनी दिली. त्यापैकी 73 हजार 394 मुली उत्तीर्ण झाल्यात. त्याची टक्केवारी 98.18 इतकी आहे.

फेरपरीक्षेत 82 टक्के उत्तीर्ण

दहावीच्या निकालात यंदा फेरपरीक्षार्थीच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झालेली आहे. विभागात 82.01 टक्के फेरपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षा 3 हजार 441 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 2 हजार 415 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

     विभागनिहाल निकाल

नागपूर 97.93
भंडारा 97.26
गोंदिया 97.07
वर्धा 96.24
चंद्रपूर 95.97
गडचिरोली 95.62

गेल्यावर्षी वर्धा जिल्हा होता प्रथम स्थानावर

दहावीच्या परीक्षेत 1 लाख 55 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 53 हजार 739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 49 हजार 133 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये सर्वाधिक नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानावर भंडारा जिल्ह्याने 97.26 टक्के तर तिसऱ्या स्थानावर 97.07 टक्क्यासह गोंदिया जिल्हा आहे. गेल्यावर्षी वर्धा जिल्हा प्रथम स्थानावर होता. 

पुरवणी परीक्षा कधी?

बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

100 टक्के गुण मिळवणाऱ्यामध्ये नागपूर विभागाचा एकही विद्यार्थी नाही

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर विभागाच्या एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. मात्र  लातूर विभागात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. यानंतर आमरावती विभागात 8 विद्यार्थ्यांनी, पुणे विभागात 8 विद्यार्थ्यांनी, तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra ssc result 2022 declared : दहावीचा निकाल 96.94 टक्के! कोकण विभागाची बाजी, जाणून घ्या विभागनिहाय निकाल

SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
TET Exam Paper Leak: बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
बुटात प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिकेचा 8 हजारांना सौदा अन् 6 लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; TET पेपरफुटीचा सर्वात मोठा खुलासा
Rahul Gandhi on TET Paper Leak: 'चूक यंत्रणेची, शिक्षा उमेदवारांना का?' TET पेपरफुटीवरून राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं; फडणवीसांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या
'चूक यंत्रणेची, शिक्षा उमेदवारांना का?' TET पेपरफुटीवरून राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं; फडणवीसांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या
Dada Bhuse: TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget