Crime : आईशी झालेल्या किरकोळ वादातून चार वर्षीय चिमुरड्याची हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार
Crime in Ulhasnagar : चिमुरड्याच्या आईशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी कांचनसिंग पासी याने चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे
![Crime : आईशी झालेल्या किरकोळ वादातून चार वर्षीय चिमुरड्याची हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार Maharashtra Crime in Ulhasnagar Four-year-old child killed in minor altercation with mother Crime : आईशी झालेल्या किरकोळ वादातून चार वर्षीय चिमुरड्याची हत्या, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/7b9ad21bdffa21d233ff78b1b82968fb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका चार वर्षीय चिमुरड्याचा शेजाऱ्याने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत मोहित (नाव बदलले आहे) या चिमुरड्याच्या आईशी झालेल्या किरकोळ वादातून आरोपी कांचनसिंग पासी याने चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी कांचनसिंग पासी याला प्रयागराग रेल्वे स्टेशनहून अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागात अमरसिंह ठाकुर हे पत्नी आणि मुलांसह राहतात. मागील आठवड्यात आरोपी कांचनसिंग याचे मृत मोहितच्या आईशी शुल्लक कारणावरून वाद झाले होते. यावेळी आरोपीला मारहाण देखील करण्यात आली होती. याचा राग आरोपी कांचनसिंगच्या मनात होता. त्याने याचा सूड घ्यायचे ठरवले आणि 20 एप्रिल रोजी मोहितचे अपहरण केले. अपहरण करून या चिमुरड्याला कांचन सिंग हा उत्तर प्रदेश या आपल्या मूळ गावी घेऊन निघाला होता. मात्र वाटेत मुलाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे कांचनसिंग याने या मुलाला अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका निर्जन स्थळी नेत गळा दाबून हत्या केली. शिवाय कोणाला कळू नये म्हणून त्याने मोहितचा मृतदेह झाडाझुडपात लपवला.
दरम्यान तीन ते चार दिवसानंतर ऑर्डनन्स भागात स्थानिकांना मृतदेह आढळून आल्यावर त्यांनी अंबरनाथ पोलिसांना याची माहिती दिली. अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनादठी पाठवला. दरम्यान उल्हासनगर पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान मोहितच्या आईशी काही दिवसांपूर्वी कांचनसिंग या शेजाऱ्याचे वाद झाले होते ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हा धागेदोरा मिळताच कांचन सिंग यांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले. त्याच्या मोबाईल फोनच्या लोकेशनच्या माध्यमातून कांचन सिंग उत्तर प्रदेशला जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उल्हासनगर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशच्या प्रयागराग रेल्वे स्टेशन वरून कांचन सिंगला ताब्यात घेतलं. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने मोहितच्या हत्येची कबुली दिली.
दरम्यान याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी कांचन सिंगला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)