एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडीतील बेपत्ता पॉवरलून व्यावसायिकाची हत्या, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, तीन लाखांची खंडणी मागितल्याचं उघड

Bhiwandi Crime: भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत या व्यावसायिकाचा मृतदेह मिळाला आहे. आरोपींनी खंडणीची मागणी केली असली तरी या हत्येमागे नेमकं कारण काय आहे त्याचा तपास पोलिस करत आहेत.

ठाणे : भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपीने शेख यांच्या व्हॉट्सअॅपवरुन कुटुंबीयांकडून तीन लाखांची खंडणीही मागितल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. 

भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात राहणाऱ्या पावरलूम व्यवसायिक फरहत अखलाक शेख 12 एप्रिल, शनिवार रोजी घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. मात्र मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग रिपोर्ट दाखल केली. शांतीनगर पोलिस मिसिंग रिपोर्टच्या आधारे तपास घेत असतानाच कुटुंबीयांना मयताच्या व्हाट्सअपवरुन एक मेसेज आला आणि तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेला फरहत शेख यांचा मृतदेह भिवंडी पोलिसांना कारिवली गावच्या जंगलात मिळाला. हा मृतदेह चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला .

सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती  

फरहत शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ येथील रहिवासी असून ते भिवंडीतील गैबीनगर परिसरात पत्नी व चार मुलींसह राहत होते. ते पॉवरलूम व्यवसाय आणि बिल्डरचे काम करायचे. फरहत शेख हे आपल्या स्कूटरवरुन एका पिवळा शर्ट घातलेल्या तरुणासोबत कारिवली गावाच्या दिशेने गेले होते असं पोलिस तपासामध्ये समोर आलं. त्याचा सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागला.

व्हॉट्सअॅपवरुन मेसेज, लोकेशन बदलले 

दरम्यान, फरहत शेख यांचे मोबाईल सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज केले जात होते. सुरुवातीला त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले गेले. नंतर 80 हजार रुपयांची मागणी झाली. ही रक्कम नंतर तीन लाखांपर्यंत गेली. सर्व चर्चा ही मेसेज स्वरूपात झाली आणि पैशाची मागणी करण्यात आली. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील झोपडपट्टीत तो मोबाईल वापरला जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागल. पोलिस तिथे पोहोचले, मात्र आरोपी सतत लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत आहे.

शेवटी चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर फरहत शेख यांचा मृतदेह कारिवली गावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay deshmukh: सुशील कराडने फेसबुक पोस्ट न करता पत्रकार परिषद घ्यावी अन्...; धनंजय देशमुखांनी एकाच वाक्यात विषय संपवला
सुशील कराडने फेसबुक पोस्ट न करता पत्रकार परिषद घ्यावी अन्...; धनंजय देशमुखांनी एकाच वाक्यात विषय संपवला
Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
Pune Crime News: दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
Santosh Deshmukh Case: आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; सरपंच संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget