Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
Ashok Kharat : सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही कापू शकतात. त्यामुळे संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, अशी मागणी देखील केली आहे.

सिंधुदुर्ग: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता माजी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. भोंदू खराताकडे अनेक राजकीय पक्षाचे नेते होते. सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळीचे प्रमाण जास्त होते. कारण गुहाटीला जाऊन रेडा कापला की पद मिळतात, ही भूमिका सत्ताधारी पक्षात होती. त्यामुळे असे अघोरी आणि बुवाबाजी वाढली. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी शिर्डी पोलिस स्थानकात एका वर्षा आधीच गुन्हा नोंद झाला होता. मात्र तो गुन्हा दबलेला होता. भोंदू खराताकडे अनेक नाव आहेत, ती एक एक बाहेर पडत आहेत. त्यामुळे खरोखरच भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे. सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही कापू शकतात. त्यामुळे संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, अशी मागणी देखील केली आहे. (MLA Vaibhav Naik)
तिथे पालकमंत्री नितेश राणे आले म्हणून आमच्यावर...
आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून माजी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही पहिला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी देखील जिल्ह्यात जमावबंदी लागू होती, मात्र तिथे पालकमंत्री नितेश राणे आले म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत की काय असा प्रश्न उपस्थित होतो. काल आम्ही शांततेत आंदोलन केलं, त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही अस म्हटलं होत. मात्र सरकारने मदत न करता, दडपशाही केली हे स्पष्ट झालं. गरीब शेतकऱ्यांना मदत न करता त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं ही शासनाची भूमिका चुकीची आहे, असे गुन्हे कितीही दाखल करा, यापुढे आमचं आंदोलन तीव्र होणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.(MLA Vaibhav Naik)
घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर कमी पडणार नाही म्हणून पालकमत्री नितेश राणेंनी सांगितलं. आम्ही आंदोलन केलं त्यावेळी देखील जिल्ह्यात गॅस संदर्भात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. मात्र सर्वत्र रांगा आहेत. पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यातील खानावळी बंदी होत असल्याने नागरिकांचे हाल होतायेत. सर्वच हॉटेल मालकांशी चर्चा करत असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.






















