एक्स्प्लोर

Tech Layoffs : दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा नोकरकपात; यामागचं नेमकं कारण काय?

Tech Layoffs : वॉल स्ट्रिटच्या अहवालानुसार, पुढील काही आठवड्यांमध्ये आणखी टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tech Company Layoffs : गेल्या काही आठवड्यांपासून दिग्गज टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात आलं आहे. वॉल स्ट्रिटच्या अहवालानुसार, पुढील काही आठवड्यांमध्ये आणखी टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार, पुन्हा एकदा मेटा ( Meta ) कंपनी लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. अर्थतज्ज्ञांच्या मते, सध्या नोकरकपातीचा हंगाम सुरु झाला आहे, असं म्हणावं लागेल.

नोकरकपात ही आर्थिक परिस्थिती आणि पुढील वर्षाचे बजेट आणि नियोजन यासह अनेक घटकांवर आधारित असते. लिफ्ट ( Lyft ) ट्रान्सपोर्ट कंपनीनेही 700 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. दिग्गज टेक कंपनी फिनटेकनेही ( Fintech ) 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला. या फक्त गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या नोकरकपात आहेत असून ही फक्त सुरुवात आहे, असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे. येत्या काही आठवड्यामध्ये आणखी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील. 

टेक कंपन्या येत्या वर्षासाठी आर्थिक नियोजन आणि योजना आखू लागल्या आहेत. मात्र या काळात कंपनीला होणारा फायदा कमी होताना दिसत आहे. अनेक आर्थिक तज्ज्ञांनी, ही आर्थिक मंदी चाहूल असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर टेक कंपन्या आपला व्यवसाय, त्यासाठीचा खर्च आणि होणारा नफा याचं नियोजन करत आहेत. त्यामुळे दिग्गज कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करुन आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. नोकरकपात केल्याने कंपनीचा पगाराचा खर्च कमी होईल.

एकीकडे जागतिक मंदी येण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यातच गेल्या वर्षभरात दिग्गज टेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. बिग टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये कमी कमाईची नोंद केली आहे, त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या भविष्याची चिंता भासू लागली आहे. वाढता खर्च आणि घटता नफा हे पाहता कंपन्यांनी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येत आहे.

कोलंबिया बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॅन वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कंपन्या खर्च कमी करण्याचा विचार करतात, तेव्हा सर्वात पहिल्यांदा कामगार खर्चात कपात केली जाते. त्यानंतर जाहिरात आणि त्यानंतर मार्केटिंग या खर्चात कपात केली जाते. त्यामुळे कंपन्या खर्च कमी करण्यासाठी सर्वात आधी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करतात.

मागील दोन वर्षामध्ये कोरोना साथीच्या रोगामुळेही अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. आता जरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं दिसत असलं तरी कंपन्यांना नफ्याहून अधिक तोट्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी टेक कंपन्यांपुढे कर्मचाऱ्यांना हटवण्याचाच पर्याय आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे? इराण इस्त्रायल युद्धाचा किती परिणाम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जगात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे? इराण इस्त्रायल युद्धाचा किती परिणाम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget