एक्स्प्लोर

फक्त 250 रुपयात सुरु केली कंपनी, आज 12000 कोटींचं साम्राज्य, RK सिन्हांनी कसा केला विस्तार   

आज आपण रवींद्र किशोर सिन्हा म्हणजेच आर के सिन्हा यांची यशोगाथा पाहणार आहोत. फक्त 250 रुपयांमध्ये 2 खोल्यांमध्ये त्यांनी एका कंपनीची सुरुवात केली होती. आज ते 12000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.

Success Story: आपल्या देशात शून्यातून मोठं विश्व निर्माण करणारे अनेक व्यवसायिक आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज आपण रवींद्र किशोर सिन्हा म्हणजेच आर के सिन्हा यांची यशोगाथा पाहणार आहोत. फक्त 250 रुपयांमध्ये 2 खोल्यांमध्ये त्यांनी एका कंपनीची सुरुवात केली होती. आज ते 12000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा. 

तुम्ही ऑफिस किंवा मॉलच्या बाहेर निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला सुरक्षा रक्षक पाहिला आहे का? हे सुरक्षा रक्षक रवींद्र किशोर सिन्हा यांनी सुरू केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खासगी सुरक्षा प्रदाता कंपनी सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (SIS) चे कर्मचारी आहेत. त्यांनी ही कंपनी दोन खोल्यांमध्ये सुरु केली होती. पण आज त्या कंपनीची उलाढाल ही 12000 कोटींहून अधिक आहे. आरके सिन्हा यांनी 1974 मध्ये पाटणा येथे या कंपनीची सुरुवात केली होती. आज त्यांची कंपनी भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये सेवा देत आहे. 

फोर्ब्सनुसार, आरके सिन्हा यांची सध्याची एकूण संपत्ती 8300 कोटी रुपये (1 अब्ज डॉलर) आहे. 36,000 हून अधिक कायम कर्मचारी आणि 3000 कॉर्पोरेट ग्राहकांसह एसआयएस कंपन्यांना आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मनुष्यबळ सुरक्षा व्यवसायातील नेते म्हणून ओळखले जाते.

कंपनीला ऑस्ट्रेलियातून अधिक महसूल 

RK सिन्हा यांच्या SIS ला ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक महसूल मिळतो. SIS ने कॅश लॉजिस्टिक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेनच्या Prosegur सह संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. आरके सिन्हा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत तर ते राजकारणी देखील आहेत. सिन्हा हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत आणि ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.

पत्रकार म्हणूनही त्यांनी केलं काम 

पाटण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आरके सिन्हा यांनी 1971 मध्ये राज्यशास्त्रात पदवी मिळवली. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी एका प्रकाशनात पत्रकार आणि प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. यादरम्यान त्यांची बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी मैत्री झाली. युद्ध संपल्यानंतर ते 1973 मध्ये जेपी चळवळीत सामील झाले. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

नोकरी गमावल्यानंत सुरु केली कंपनी 

नोकरी गमावल्यानंतर, दोन महिने आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी त्यांना फक्त 250 रुपये पगार होता. जो प्रकाशन कंपनीने दिला होता. पुढे काय करावं याचा विचारच त्यांना होत नव्हता. त्यादरम्यान त्यांना बांधकाम व्यवसाय असलेल्या त्यांच्या एका मित्राची भेट झाली. प्रकल्पस्थळाच्या सुरक्षेसाठी माजी सैनिक शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्हा यांनी युद्धादरम्यान बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. तेव्हा त्या मित्राने त्यांना सुरक्षा कंपनी स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आरके सिन्हा यांनी माजी सैनिकांशी संपर्क साधला. त्यापैकी अनेक जण निवृत्तीनंतर कामाच्या शोधात होते. फेब्रुवारी 1974 मध्ये पाटणा येथे दोन खोल्यांमध्ये SIS ची स्थापना करण्यात आली. त्यांनी बिहार रेजिमेंटमधील त्यांच्या संपर्कांना भेटून सेवानिवृत्त जवानांची माहिती घेतली आणि त्यांना काम करण्यास पटवून दिले. SIS ची स्थापना झाल्यानंतर एका वर्षात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 250-300 पर्यंत वाढली आणि उलाढाल 1 लाख रुपयांच्या पुढे गेली.

कंपनीचा महसूल 12000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे

गेल्या वर्षी आरके सिन्हा यांनी सांगितले होते की त्यांच्या कंपनीत 284000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये SIS समूहाचा कंपनीचा महसूल (FY24 मध्ये SIS महसूल) रु. 12261 कोटींवर पोहोचला आहे आणि Ebitda रु. 585 कोटी झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Maharashtra Live blog updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Maharashtra Live blog updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Maharashtra Live blog updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Maharashtra Live blog updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
Mumbai News Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
Mumbai News Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
Embed widget