एक्स्प्लोर

Repo Rate and EMI : रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ, तुमच्या गृहकर्जावर कसा होतोय परिणाम? समजून घ्या गणित

Repo Rate and EMI : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जाचे हप्ते महाग झाल्याचे म्हटले जाते. रेपो दर कर्जाच्या हप्त्यांवर नेमका कसा परिणाम करतो, हे जाणून घ्या..

Repo Rate and EMI : रिझर्व्ह बँकेने अचानकपणे रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता कर्ज व्याज दरात वाढ झाली आहे. रेपो दर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ केली असून नवीन दर लागू केले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून  रेपो दरात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.75 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर मोठ्या प्रमाणावर होणार असून गृह कर्ज महागणार आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम बँकेच्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या गृहकर्जांसारख्या किरकोळ कर्जांवर होतो. बहुतेक बँकांनी त्यांचे कर्ज दर आरबीआय रेपो दराशी जोडले (RLLR)आहेत आणि त्यामुळे कर्जदारांना त्याचा तात्काळ परिणाम जाणवतो.

रेपो दराने कसे बिघडवले कर्जाचे गणित?

रेपो दरवाढीमुळे सामान्यांच्या कर्जाचे हप्ते वाढले आहेत. साधारणपणे 15 वर्षांसाठी घेतलेल्या गृहकर्जावर 0.4 टक्के रेपो दर वाढल्याने गृहकर्जाच्या हप्त्यात 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उदाहरण म्हणून 35 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी गृहीत धरल्यास, रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ झाल्याने व्याजाचा बोजा दरवर्षी 6.7 टक्के इतका होतो. (जवळपास 1.42 लाख रुपये )

तुम्ही जर 35 लाखांसाठी 7.1 टक्के दराने गृहकर्ज घेतले असल्यास दरमहा 31,655 रुपये ईएमआय देता. या कर्जाच्या रक्कमेसाठी तुम्ही 21,97,898 रुपये व्याज देता. 

जर, व्याज दरात 0.4 टक्क्यांनी वाढ झाल्यास 7.5 टक्के व्याज दर होईल. त्यावेळी 35 लाखांसाठी तुमचा दरमहा ईएमआय 32,445 रुपये होईल. तर, तुम्हाला कर्ज घेतलेल्या रक्कमेसाठी 23,40,178 रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे. 

रेपो दरात आणखी वाढ झाल्यास, ईएमआय अधिक वाढेल. गृहकर्जाच्या व्याजदरात 0.5 टक्के आणि 1 टक्के वाढ झाल्यास, ईएमआय अनुक्रमे 3.1 टक्के आणि 6.2 टक्क्यांनी वाढतो. 

सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. त परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. बहुतेक RLLR कर्जदारांसाठी, RBI रेपो दर वाढीचा अर्थ कर्जाच्या कालावधीत वाढ असा आहे. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या हप्त्यांच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला देता. 

MCLR कर्ज घेणाऱ्यांवर काय परिणाम?

MCLR लिंक्ड कर्ज घेतलेल्यांवर रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम जाणवत नाही. MCLR लिंक्ड कर्जामध्ये व्याजाचा कालावधी निश्चित असतो. यामध्ये 12 महिने अथवा सहा महिन्यानंतर MCLR मध्ये बँकांकडून बदल केला जातो. 

गृहकर्जाच्या व्याज दरात चढ-उतार होत असतो. त्यामुळे कर्ज, व्याज दराच्या बोझ्यापासून सुटका हवी असल्यास, तुमच्याकडे पैशांची अधिक बचत होत राहिल्यास मूळ कर्जाची रक्कम फेडण्याचा प्रयत्न करावा, असे तज्ज्ञ सुचवतात. 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget