एक्स्प्लोर

आंबा महागणार! हवामान बदलाचा पिकावर परिणाम, उत्पादनातही होणार घट 

यावेळी आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण बदलत्या हवामानाचा पिकावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं उत्पादनात घट होणार आहे. 

Mango : आंबा (Mango) हे जगातील लोकांचे सर्वात आवडते फळ आहे. दरवर्षी हंगामात आंब्यांना मोठी मागणी असते. दरम्यान, यावेळी आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण बदलत्या हवामानाचा पिकावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं उत्पादनात घट होणार आहे. 

यावेळी दशहरी, चौसा, लंगडा, मालदा या प्रसिद्ध वाणांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण वातावरणातील बदलामुळं यंदा आंबा पिकाला आतापर्यंत कमी फुले आली आहेत. प्रत्येक वेळी फेब्रुवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येतो. मात्र यावेळी तसे झाले नाही. वातावरणातील बदलाच्या प्रभावामुळे यावेळी आंबा पिकाला अधिक फटका बसला आहे. हवामानाचा आंबा पिकावर होणारा परिणाम लक्षात घेता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे शास्त्रज्ञही चिंतेत आहेत. यावेळी आंबा पिकासाठी मार्चचा पहिला आठवडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे येथील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मार्चमध्ये आंब्याच्या झाडांना मोहोर आला नाही, तर यावेळीही आंबा उत्पादनातही घट होणार आहे.

आंब्यावर हवामान बदलाचा परिणाम

वातावरणातील बदलामुळे जगभरातील धान्यांपासून भाजीपाला पिकांवर आधीच परिणाम होत आहे. आता बागकामावरही परिणाम होत आहे. वातावरणातील बदलामुळे केवळ उत्पादनच कमी झाले नाही तर अनेक पिकांचे भावही वाढले आहेत. यावेळी हवामानातील बदलाचाही आंबा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रभातकुमार शुक्ला यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान प्रत्येक वेळी १५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असे, जे आंबा पिकासाठी अतिशय चांगले मानले जाते. मात्र यावेळी संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली राहिले. त्यामुळे यंदा आंबा पिकाला फुले वेळेवर आली नाहीत.

उत्तर भारतातील आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे किमान आणि कमाल तापमानात सातत्याने तफावत आहे. अवकाळी पावसामुळे किमान तापमानातही वाढ होत नाही. त्यामुळे यावेळी केवळ 10 टक्के आंब्याच्या झाडांना मोहोर आला असून 90 टक्के झाडे अद्याप उघडी आहेत. संपूर्ण उत्तर भारताची ही स्थिती आहे, तर दक्षिण भारतात यावेळी आंब्याचे पीक चांगले आहे.

आंब्यासाठी अधिक पैसे खर्च करावा लागणार 

यावेळी लोकांना आंब्याच्या गोडीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. यावेळी हवामान बदलाचा परिणाम पिकांवर झाल्याने उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. यामुळे यावेळी लोकांना महागडा आंबा खरेदी करावा लागू शकतो.

देशात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशात

देशात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशात होते. पण यावेळी कदाचित यामध्ये बदल होऊ शकतो. हवामान बदलाच्या प्रभावामुळं बहुतांश आंबा पिकांना अद्याप मोहोर आलेला नाही. त्यामुळं फळधारणेची शक्यताही कमी होऊ लागली आहे. ही स्थिती केवळ लखनौमधील मलिहाबादचीच नाही तर मेरठ, सहारनपूरच्या चौसा पट्ट्यात आणि पूर्वांचलच्या लंगडा आंब्याच्या बागांचीही आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही हीच परिस्थिती आहे. किमान तापमानात वाढ झाल्यास काही बदल नक्कीच होऊ शकतात. अन्यथा या वेळी आंब्याच्या झाडांना गतवर्षीप्रमाणे पीक येणार नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget