एक्स्प्लोर

Power Of Silence : व्यर्थ बोलणे हेच माणसाच्या सर्व दु:खाचे कारण! गप्प राहण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या 

Power Of Silence : बोलणे हे माणसाच्या सर्व दु:खाचे कारण आहे, कारण गरजेपेक्षा जास्त बोलणे हे दु:खाचे कारण आहे. म्हणूनच कमी बोला, अचूक बोला, गोड बोला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक तेवढेच बोला.

Power Of Silence Importance in Life: धर्मांमध्ये 'मौन'ला (Silence) खूप महत्त्व दिले गेले आहे.  यात म्हटलंय की, केवळ बोलण्यातच नाही तर गप्प राहण्यात म्हणजेच मौनातही शक्ती असते. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केले आहे की, मौनाचा आरोग्याशी तितकाच संबंध आहे, तपस्वी झालेल्या सर्व संत आणि ऋषीमुनींनी शांत राहून आणि ध्यान करून जगाचे सखोल ज्ञान प्राप्त केले. जाणून घ्या याचे महत्त्व (Power Of Silence Importance)


बोलणे हे दु:खाचे कारण

बोलणे हे आपल्या आयुष्यात एक नाही तर अनेक दु:खाचे कारण आहे. कारण माणसाची समस्या अशी आहे की, आपण गप्प बसू शकत नाही. नेहमी काहीतरी, कोणाच्या मनाला लागेल असे बोलत असतो,  तुमच्या या बोलण्यामुळे जीवनात अर्ध्याहून अधिक दुःखे निर्माण होतात. आपले बोलणे देखील कुटुंबात कलहाचे कारण आहे. शास्त्रज्ञांनी देखील हे मान्य केले आहे की, मौन राहिल्यामुळे मानसिक शांती मिळते. मौनामुळे विचारांमध्ये एकाग्रता येते आणि तुमच्यातील उर्जा वाढते.

 

आपण किती बोलतो याचा कधी विचार केला आहे का?
जेवढे भूक लागते तेवढे अन्न तुम्ही खातात, आवश्यक तेवढे काम करता, पण आपण किती बोलतो याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही आवश्यक तेवढेच बोलता की, दिवसभर अनावश्यक बोलतात? कधीतरी एकटे बसून याचे आत्मचिंतन तसेच विचार करा, तुम्ही दिवसभरात किती बोललात, काय बोललात आणि मुख्य म्हणजे का बोललात? यापैकी किती गोष्टी आवश्यक होत्या आणि किती अनावश्यक होत्या? याचा देखील विचार करा

 

अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा

माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला आपल्या मनात काय चालले आहे ते इतरांना सांगायचे असते आणि समोरची व्यक्तीही आपल्यासोबत तशाच पद्धतीने वागते. मात्र या गोष्टी जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित असतील तर त्या ऐकण्याचे आणि कथन करण्याचे काम अधिक आवडीने केले जाते. जेव्हा तुम्ही एकटे बसता तेव्हा या गोष्टींचा पुन्हा विचार कराल. अशा व्यर्थ गोष्टी ऐकण्या-सांगण्याचं वातावरण आयुष्यभर चालतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ, तुमचं आयुष्य, तुमची विचारसरणी, समज आणि ते मौल्यवान क्षण गमावून बसतात. जे जगता आणि उपभोगता आले असते. तेव्हा अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा.

 

मौनाची शक्ती काय आहे?

धर्मांमध्ये सांगितल्याप्रमाणे, जोपर्यंत आपण व्यर्थ बोलत राहिलो तोपर्यंत आपल्या मनात अशांतता राहील, पण ज्या दिवशी आपण मनातून शांत होऊ, तेव्हा तोंडातून जे निघेल ते चांगले आणि मोजकेच असेल. जगात असे काही दुष्कृत्ये आहेत, कुटुंबात संकटे आहेत, पती-पत्नीमध्ये वाद आहेत, ते सर्व व्यर्थ आणि विचार न करता बोलण्यामुळे आहेत. त्यामुळे व्यर्थ बोलणे म्हणजे उर्जेचा अपव्यय आहे.


म्हणूनच आवश्यक तेवढेच बोला...
म्हणूनच या पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवासात राहिले, कारण त्यांना फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते. महावीरांना 12 वर्षे आणि महात्मा बुद्धांना 10 वर्षे मौन धारण करून ज्ञान प्राप्त झाले. महर्षी रमण आणि चाणक्य हे देखील मौनाचे उपासक होते. पण तुम्हाला या जगात राहूनही तुम्ही हे गुण घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्यातील उर्जा वाचवाव्या लागतील, ज्या तुम्ही निरर्थक शब्दात नष्ट करता. म्हणूनच आवश्यक तेवढेच बोला. आणि मुद्द्याचे बोला.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Weekly Horoscope 23 to 29 January 2023: 'या' राशींसाठी हा आठवडा खास!  साप्ताहिक राशीभविष्य

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget