एक्स्प्लोर

Chanakya Niti : मुलांना आत्तापासूनच 'या' 5 सवयी शिकवा; यशाचा मार्ग सोपा करण्यासाठी चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत चाणक्यांनी (Chanakya Niti) महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून "अर्थशास्त्र", "कुटनीती", "चाणक्य नीती" ही रचना केली होती. आजवर आचार्ण चाणक्य यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. त्यामध्ये मुलांच्या (Children) अशा काही सवयी आहेत ज्यांचे पालन केल्यास मुलं यशस्वी होतात हेही त्यांनी सांगितलं आह. तर, हे मार्ग किंवा या सवयी नेमक्या कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात. 

1. ध्येय नेहमी लक्षात ठेवा

चाणक्य नीतिनुसार, लहान मूल, विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय, लक्ष्य नेमकं काय आहे याबाबत त्यांना कधीच विसर पडता कामा नये. त्यांनी ते नेहमी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तसेच, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी कठोर परिश्रम केले पाहिजेत. तरच, जीवनातील यशाचा मार्ग सुकर होईल. 

2. आयुष्यात शिस्त महत्त्वाची 

लहान मुलांनी आपलं जीवन शिस्तीत जगणं गरजेचं आहे. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असावी, ज्याप्रमाणे संत नेहमी ध्यानात मग्न असतात, त्याचप्रमाणे मुलांनाही शिक्षण ग्रहण करता आलं पाहिजे.

3. ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा

चाणक्य नीतीनुसार मुलांनी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. हा काळ वाचनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच, यावेळी वाचलेल्या गोष्टी देखील लवकर लक्षात राहतात. त्याचबरोबर आपल्याला हवी असलेली मानसिक शांतताही याच वेळी मिळते. 

4. वेळेचं महत्त्व लक्षात घ्या

कोणत्या वेळी काय करावे हे मुलांनी वेळीच शिकणं फार महत्वाचं आहे, तरच यश फार लवकर आणि सहज मिळवता येते. विद्यार्थ्यांनी आपलं काम वेळेत पूर्ण केलं तर यशाची उंची लवकर गाठता येते.  

5. संतुलित आहार घ्या 

विद्यार्थ्यांनी नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.यामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं. यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं निरोगी शरीर हे नेहमी लक्षात ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Grah Gochar 2025 : शनि-बुधाची मार्गी चाल, राहूचंही नक्षत्र परिवर्तन; नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी 'या' राशींची चांदीच चांदी, ग्रहच करणार मालामाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
Embed widget