एक्स्प्लोर

Chanakya Niti: 'श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही! फक्त 'या' गोष्टींवर खर्च करा', आचार्य चाणक्यांचा मूलमंत्र, एकदा पाहाच..

Chanakya Niti:आचार्य चाणक्यांच्या मते, जर तुम्ही 'या' तीन गोष्टींवर खर्च केला, तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

Chanakya Niti: आजकाल आपण पाहतो.. श्रीमंत होण्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. विविध उपाय करतात, पण त्यांच्या मेहनतीला यश मिळतेच असे नाही. जर एखाद्या व्यक्तीने पैशाचा योग्य वापर केला तर तो केवळ श्रीमंतच होत नाही, तर त्याचे जीवन आनंदी आणि यशस्वी देखील बनवू शकतो. असं आम्ही नाही आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीमध्ये सांगितलंय..आचार्य चाणक्य हे भारतातील महान विचारवंत आणि राजकारण्यांपैकी एक होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असेही म्हणतात. त्यांची धोरणे आणि तत्त्वे आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक आहेत. पैशाचा योग्य वापर आणि जीवन यशस्वी करण्यासाठी चाणक्यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांच्या मते, श्रीमंत होण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टींवर आपण सर्वात जास्त पैसा खर्च केला पाहिजे. जाणून घेऊया त्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?

'ही' माणसाची सर्वात मोठी संपत्ती

आचार्य चाणक्य मानत होते की, शिक्षण आणि ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांनी म्हटलंय की, “विद्या धनम् सर्व धनम् प्रधानम्” म्हणजेच ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने प्रथम आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षण आणि ज्ञानाच्या साहाय्याने एखादी व्यक्ती केवळ योग्य आणि चुकीचा फरकच करू शकत नाही, तर आपल्या जीवनात योग्य निर्णय देखील घेते. चाणक्य म्हणाले की, सुशिक्षित व्यक्तीचा समाजात आदर केला जातो आणि त्याला संधींची कमतरता नसते. शिक्षणावर खर्च करण्यास आपण कधीही कमी पडू नये. मग ते औपचारिक शिक्षण असो किंवा विशिष्ट कौशल्य शिकण्याची संधी असो. ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी गुंतवणूक करावी...

आपले शरीर निरोगी नसेल तर...

चाणक्याने म्हटलंय की “शरीरमाद्यम् खलु धर्मसाधनम्” म्हणजेच शरीर हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे आपण आपली सर्व कर्तव्ये पार पाडू शकतो. जर आपले शरीर निरोगी नसेल तर आपण जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. आरोग्य ही जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि श्रीमंत होण्याच्या दिशेने सर्वात महत्वाची पायरी आहे. चाणक्याने आरोग्यावर खर्च करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. उत्तम आरोग्यासाठी, योग्य खाण्याच्या सवयी, व्यायाम, योगासने आणि ध्यान यांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार करणेही आवश्यक आहे. जर तुम्ही निरोगी असाल, तर तुम्हाला दीर्घायुष्य तर लाभेलच पण तुमच्या कामात उत्कृष्टताही मिळवता येईल.

योग्य लोक आणि नातेसंबंधांवर खर्च करा

चाणक्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या संपत्तीचा काही भाग चांगले लोक आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी खर्च केला पाहिजे. त्यांनी म्हटले आहे की, "सोबतीचा माणसाच्या जीवनावर प्रभाव असतो." श्रीमंत होण्यासाठी योग्य संगती असणे खूप गरजेचे आहे. चाणक्य यांनी जीवनात चांगले मित्र आणि कुटुंबाचे महत्त्व स्पष्ट केले. जर तुमच्या आजूबाजूला चांगले आणि सकारात्मक लोक असतील तर ते तुम्हाला मानसिक संतुलन तर ठेवतीलच शिवाय तुम्हाला यशाकडे प्रवृत्त करतील असा त्यांचा विश्वास होता. चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करणे आवश्यक आहे. योग्य लोकांवर केलेला हा खर्च तुम्हाला मानसिक समाधान आणि जीवनात स्थिरता देईल.

हेही वाचा>>>

Garud Puran: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा कुटुंबात का भटकत असतो? आत्मा यावेळी काय विचार करतो? गरुड पुराणात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget