एक्स्प्लोर

Rice Production : तांदूळ उत्पादक राज्यात पावसाची कमतरता, यावर्षी उत्पादनात 10 दशलक्ष टनांनी घट होणार 

2022-23 मध्ये तांदळाच्या उत्पादनात जवळपास 10 दशलक्ष टनांची घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण, चालू खरीप हंगामात तांदळाच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

Rice Production : यावर्षी देशात तांदळाच्या उत्पादनात (Rice Production) घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा म्हणजे 2022-23 मध्ये तांदळाच्या उत्पादनात जवळपास 10 दशलक्ष टनांची घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण, चालू खरीप हंगामात तांदळाच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी तांदळाचे उत्पादन 10 दशलक्ष टनांची घटून  120 दशलक्ष टनांवर येऊ शकते अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

तांदळाच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट 

दरम्यान, सध्या देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. तर काही राज्यांमध्ये अद्याप चांगला पाऊस झाला नाही. त्याठिकाणी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मुख्य धान्य उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा जोर अद्यापही वाढला नाही. कमी कमतरतेमुळं त्याठिकाणी तांदळाच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपर्यंत भाताच्या लागवडीचे क्षेत्र हे 27.43 दशलक्ष हेक्टर होते. मागील वर्षीचा विचार केला तर यंदा लागवडीत घट आली आहे. एका वर्षापूर्वी 31.41 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. 

कमी पावसाचा लागवडीवर परिणाम

सध्या तांदळाच्या लागवडीचा हंगाम संपला आहे. यंदा लावडीत घट आल्यामुळं उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पश्चिम बंगाल हे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. तसेच झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकरी उत्पादनात देखील घट झाली आहे. 8 ऑगस्टपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशात ३६ टक्के पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झाला आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा 43 टक्के पाऊस कमी झाला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये अनुक्रमे 38 टक्के आणि 45 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 46 टक्के कमी पाऊस पडला आहे.
 
2021-22 वर्षात तांदळाचे 129.66 दशलक्ष टन विक्रमी उत्पादन  

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 पीक वर्षात (जुलै-जून) तांदूळ उत्पादन विक्रमी 129.66 दशलक्ष टन होते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला होता. केंद्राकडे 1 जुलैपर्यंत 47 दशलक्ष टन तांदळाचा साठा होता. तर 13.5 दशलक्ष टनांचा बफ स्टॉक आहे. दरम्यान, मार्चमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा गव्हाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. गव्हाचे उत्पादन घटले आहे. कमी उत्पादन आणि वाढलेल्या खासगी व्यापारामुळं मुख्य अन्नपदार्थांच्या सरकारी खरेदीमध्ये 56 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळं तांदळाच्या साठ्यावरही ताण आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget