एक्स्प्लोर

Sadabhau Khot: मधू दंडवते यांचं कोकणात स्मारक व्हावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटना मैदानात उतरणार : सदाभाऊ खोत

कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारावे लागेल. कोकणातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

Sadabhau Khot : कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आजही न्याय मिळालेला नाही, अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारावे लागेल. तसेच राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विकास होणार असेल, रोजगार निर्मिती होणार असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबविला पाहिजे, असे मत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

सदाभाऊ खोत यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी 29 एप्रिलपासून सिंधुदुर्गातुन केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून खोत हे शेतकऱ्यांचे तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न समजून घेत आहेत. तसेच या प्रशानवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान सुरु आहे. 
आपण आमदार म्हणून भविष्यात पर्यावरण व कृषी पर्यटनातून विकास साधण्यासाठी राजापूर तालुक्यातील एक गाव दत्तक घेणार असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली. कोकणातील शेतकऱ्यांना सुयोग्य अशा मार्गदर्शनाची आवश्यकता असून येथील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही खोत यांनी यांनी यावेळी सांगितले.

मधू दंडवते यांचे भव्य स्मारक व्हावं

कोकणात कोकण रेल्वे आणण्यामध्ये स्वर्गीय मधू दंडवतेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून कोकणात त्यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. तर राजापूर रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचे नाव द्यावे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य मंत्री यांची भेट घेऊन तसे पत्र देणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत मागील सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री असताना मंजुर झालेल्या तालुक्यातील पांगरे बुद्रुक प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी व मागण्यांबाबत प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आ. खोत यांनी चर्चा केली व तात्काळ प्रलंबित मागण्या पुर्ण करणेबाबत सुचना केल्या आहेत.

लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते. शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते. परंतु प्रकल्प अर्धवट स्वरुपात राहिले, तर त्या खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो आणि भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रके करुन निधी उभा करावा लागतो. ताम्हाणे धरण जवळजवळ 20  ते 21 वर्ष धरण मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे. या धरणाला भेट देऊन सदर धरणाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.  रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील काजिर्डा धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळूवन देण्यासाठी त्या धरणाला भेट देऊन ग्रामस्थांची भेट खोत यांनी घेतली. गेले 25 वर्षे काजिर्डा ग्रामस्थांनी जामदा प्रकल्पाविरोधात संघर्ष करून लढा सुरु ठेवला आहे. बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीला पुन्हा सुरु करण्यात आले असून यावेळी ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. यासाठी लवकरच आदोंलनाचा पहिला टप्पा आम्ही सुरू करु. लाखोंच्या संख्येने मैदानात उतरु, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Embed widget