एक्स्प्लोर

महाराष्ट्रात युरियाचा साठा संपत आलाय, कृषिमंत्र्यांचं जे.पी. नड्डा यांना पत्र; केंद्राकडे तातडीची मागणी

शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन सुरळीत होण्यासाठी केंद्राने ही मागणी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे भरणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Mumbai News: महाराष्ट्रात 2025 रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहीत राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ 2.36 लाख मॅट्रिक टन इतकाच राहिला असल्याने तातडीने युरिया पुरवठा होण्याची गरज त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. 

युरियाचा साठा झपाट्याने कमी

राज्याला एप्रिल ते जुलै दरम्यान केंद्राकडून 10.67 लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप होणे अपेक्षित होते, मात्र आतापर्यंत 8.41 लाख मेट्रिक टन म्हणजेच फक्त 79 टक्के युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्याचे वाटप 2.79 लाख मेट्रिक टन युरियापैकी फक्त 0.96 लाख मेट्रिक टन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.राज्यात खरीप हंगामातील पेरणी जवळजवळ 98 टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र 144 लाख हेक्टर आहे. यंदा मक्याची पेरणी 14.30 लाख हेक्टरवर झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 54 टक्क्यांनी वाढलेली आहे. या परिस्थितीत कापूस, मका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे.

युरियाचा त्वरित पुरवठा होणे अत्यंत गरजेचे

कृषिमंत्री भरणे यांनी पत्रात सांगितले की, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या युरियाच्या वाटपाची त्वरित पूर्तता करावी आणि प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा. यासोबतच, आगामी रब्बी हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे. माहितीप्रमाणे, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरियाचा त्वरित पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन सुरळीत होण्यासाठी केंद्राने ही मागणी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे भरणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पाण्यात

महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne on Rain: मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन, 24 जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन, 24 जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget