एक्स्प्लोर

मधमाशांमुळे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्क्यांची वाढ, कोणत्या पिकात किती होते वाढ?

आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात (Crop Production) 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते.

Crop Production : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात (Crop Production) 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील (Dr. C. S. Patil) यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. 

कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक

आहारातील एक तृतीयांश भाग परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे 5 ते 40 टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते, असेही संशोधनात पुढे आले आहे. कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक ठरत आहे. पण त्याशिवाय मधामध्ये कीडनाशकांचा अंश आढळून येत आहे, हे जास्त धोकादायक आहे. किडनाशक मंडळाने 329 किडनाशके प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी वापरावीत. कीडनाशकांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही पाटील यावेळी म्हणाले.

कोणत्या पिकात किती होते वाढ?

विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो. तसेच पिकांना कीटकांपासून वाचविण्यातही मदत होत असते. मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होणारी  विविध पिके आहेत. तेलवर्गीय मोहरीत 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, तीळ 22 ते 37, सोयाबीन 19 टक्के, एरंडी 30, जवस 17 ते 40, नायगर 22 टक्के उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. 

मध हे सर्वात पौष्टिक अन्न, मध्यामध्ये औषधी गुणधर्म

मधमाशांमुळं मिळणारे मध हे सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. डोळ्यासाठी हितकारक, स्वरामध्ये सुधारणा, बुद्धीधारणक्षमता वाढविणारा म्हणून मधाची ओळख आहे. खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्दयरोग, मळमळ यावर मध गुणकारी आहे. तसेच भूक वाढवण्यासाठीही तो उपयुक्त आहे. मधमाशांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक तरी मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शेतात असलेल्या मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे. तसेच प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे.

मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी

मधमाशी अर्धा ते एक किलोमीटर भागात फिरून एक पोळी तयार करते. फुलोरी मधमाशी ही परागीभवणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मधमाशीचे एक पोळे नष्ट करणे म्हणजे त्या शेत शिवारातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे. तसेच आग्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाशा असतात. जाळ करून किंवा धूर करून माशा उडवल्या आणि मध काढला तर जवळपास 25 एकर मधील जंगल नष्ट होते. त्यामुळे मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी. मधाच्या पोळ्यामध्ये मध असलेला भाग फुगीर होतो. तेवढा भाग वेगळा काढून आपण मधमाशीचे पोळे वाचवू शकतो. पुन्हा ते पोळे पूर्ववत लावल्यास बाहेर गेलेल्या माशा त्यावर परत येतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. 

मधमाशांच्या मुख्य जाती कोणत्या?

आग्या माशी आणि फुलोरी माशी या दोन माशांच्या जाती जंगली मधमाशा आहेत. तर सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या पेटीत पाळता येणाऱ्या मधमाशा आहेत. फुलोरी मधमाशी पेटीत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ही स्थानिक मधमाशी आहे. ती स्थानिक हवामानाशी जुळलेली असते. स्थानिक पिकांच्या फुलांवर खूप मोठ्या प्रमाणात तिचा आढळ आहे तसेच तिचा परागीभवनाच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Red Honey: दारुपेक्षा जास्त नशा 'या' लाल मधात! जगभरातून मोठी मागणी; कुठे मिळतं हे मध?

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
RCB vs GT IPL 2026 Final Rain Update : गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
Embed widget