एक्स्प्लोर

Success Story : परभणीच्या दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग, उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती  

Success Story : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात मशरुम उत्पादनाचा (Mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे.

Success Story : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या तीन तरुण शेतकऱ्यांनी मशरुम उत्पादनाचा (Mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (Murumba) गावात मशरुम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. योगेश झाडे बीएस्सी अॅग्री, मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख अशी या तीन उच्चशिक्षित तरुणांची नावे आहेत. 

योगेश झाडे यांच्या घरी वडिलांची 15 एकर जमीन आहे. त्यांनी स्वतः कृषी विषयातून पदवी घेतली आहे. पारंपारिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं या तीन तरुणांनी एकत्र येत दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधलीय. थंड प्रदेशात येणारे मशरूम दुष्काळी पट्ट्यात आले आहे.

कमी खर्चात मशरुम उत्पादनासाठी शेडची निर्मिती

परभणीच्या मुरुंबा गावातील तरुण योगेश झाडेने बीएस्सी अॅग्री तर मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख या दोघांनी कॉमर्सच्या पदव्या घेतल्या आहेत. वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळं शेतीत नवीन काही तरी करायचे या तिघांनी ठरवले. त्यानंतर तिघांनी मशरुम घेण्याचा निर्णय केला. त्याबाबत प्रशिक्षण घेऊन मंगेशच्या शेतातील केवळ दोन गुंठ्यात त्यांनी तुराट्या आणि ज्वारीच्या कडब्याचे शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदाण्याचे अच्छादनही दिले. बाबूंचे टेबल तयार केले असा हा कमी खर्चात त्यांनी मशरुम उत्पादन करण्यासाठी आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून शेड उभारले.

नेमकं मशरूम उत्पादन होते कसे?

गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुस्सा घेऊन 100 लिटर पाण्यात 150 ml formalin आणि 12gm bavestin मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण घेतलेला भुसा त्या पाण्यात 12 ते 14 तास भिजू घालायचा. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात 60 टक्के आद्रता झाल्यास त्या भुस्यामध्ये (spawn) मशरुम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरुन घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवा बंद रुममध्ये ठेवायचे. ज्या रुमचे तापमान 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस आणि आद्रता 60 टक्के ते 70 टक्के असावी. 15 दिवसानंतर ते बेड पांढरे शुभ्र पडल्यावर मोकळे करुन ठेवायचे. बेड मोकळे केल्यावर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारायचे. 25 दिवसानंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते. मशरूम पीक हे साधारण 45 दिवसाचं असते.

खर्च जाऊन दीड महिन्यात जवळपास 30 ते 35 हजारांचा फायदा

मशरुम हे 45 दिवसांचे पीक आहे. 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. हे मशरुम काढल्यानंतर याचे पॅकेजिंग 200 ग्रॅम, 400 ग्रॅम आणि 1 किलो अश्या मागणीप्रमाणं केली जाते. ज्याला 300 रुपये प्रति किलो दर त्यांनी निश्चित केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटची काढणी करेपर्यंत सर्व मिळून उत्पादन खर्च हा सहा हजारांपर्यंत येतो. याचे उत्पन्न हे 40 हजारांच्या आसपास होते. सगळा खर्च जाऊन या तरुणांना 45 दिवस म्हणजे दीड महिन्यात जवळपास 30 ते 35 हजारांचा फायदा होतो..

 बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर

कुठल्याही उत्पादनाला बाजारपेठ मिळणे गरजेचे असते. या तरुणांनी हेच लक्षात घेऊन बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा अतिशय योग्य प्रकारे वापर केला. ज्यामध्ये त्यांना यश आले. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप आणि इंस्टाग्राम यावर हे तरुण मशरुमच्या उत्पादन आणि विक्रीबाबत नियमित पोस्ट करतात. त्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून स्वतः जिल्हाधिकारी अनेक डॉक्टर आणि इतरांनी त्यांच्या या उत्पादन प्रक्षेत्राला भेट देऊन मशरुम खरेदी करत त्यांचे कौतुक केले आहे. 

 मोठ्या कंपन्यांनाही मशरुमची विक्री करण्याचा मानस

सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या तीन तरुणांनी मशरुम उत्पादन घेतले आहे. त्यातच योग्य मार्केटिंग आणि मिळत असलेला दर पाहता येणाऱ्या काळात मशरुम उत्पादन हे केवळ नागरिकांना नाही तर मोठ्या कंपन्यांनाही विक्री करण्याचा या तिघांचा मानस आहे. त्याच दृष्टीने त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करुन नाविन्यपुर्ण मशरुमचे उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी निश्चित आशादायी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Jungly Mushroom : मटनापेक्षाही महाग मशरुम! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या 'जंगली मशरुम'ची चर्चा  

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget