शरीर अॅक्टीव्ह आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, प्रत्येकजण आहारात फळांचा समावेश करतो.
अनेक वेळा हा प्रश्न पडतो की फळं खाणं जास्त फायदेशीर आहे की फळांचा रस पिणे फायदेशीर आहे. दोघांपैकी कोणती निवड करावी? याबाबत गोंधळ होतो.
संपूर्ण फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायबर मिळते, जे पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
ताजी फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपणा आणि आजारांचा धोकाही कमी होतो.
फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला भरपूर आहार मिळतो. यासोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
एक किंवा अधिक फळे मिसळून फळांचा रस तयार केला जातो. फळांचे सेवन करण्याचा हा एक सोपा मार्ग असू शकतो.
पण, ज्यूसमध्ये संपूर्ण फळांमध्ये आढळणारे फायबर नसतात आणि संपूर्ण फळांचे सर्व पोषक आणि अँटिऑक्सिडंट टिकवून ठेवत नाहीत.
ज्यूसिंग 'हेल्दी' ड्रिंक म्हणून पाहिले जात असले तरी, ज्यूसिंग वजन कमी करण्यास मदत करते असा कोणताही दावा करत नाही.
फळे आणि फळांचे रस दोन्ही निरोगी आहाराचा एक भाग असू शकतात. पण, तुम्ही जर नुसती फळं खाल्ली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.